व्रत वैकल्याचा वेगळा विचार
==================
भाग २
डॉ. नरेंद्र दाभोळकर
==================
भाग २
डॉ. नरेंद्र दाभोळकर
व्रतवैकल्ये हि शेवटी आपल्या समाज जीवनाशी निगडीत आहेत. त्याला काही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संदर्भ आहेत. दसरा-संक्रांत यासारखे सण स्नेहसंबंध वाढवायला उपयोगी पडतात . हरितालिका, मंगळागौरीच्या निमित्ताने थोडा मैत्रिणींचा सहवास, थोडं माहेरपण , थोडी निसर्गाशी जवळीक साधते. शेतीवर आधारलेल्या जीवनाशी नाते जोडणारा पोळा, नागपंचमी, दिवाळी हे सण आहेत. व्रतवैकल्यांना त्या-त्या काळाचे काही उपयुक्त संदर्भ आहेत. आत्मसंयमाची शिकवण आहे. हे सगळे मानले तर मग त्यात कालोचित बदल करावा हे मानणे का जड जावे? या धार्मिक कर्मकांडांवरचा अनावश्यक सर्व खर्च टाळावा, विषमतेचा संदर्भ सोडवा , त्यांना कालसुसंगत अधिक आशयपूर्ण संदर्भ द्यावा असे का करू नये?
महारांना ब्राह्मणाबरोबर पंक्तीत बसवणाऱ्या आणि त्याबद्दल ब्राम्हणांनी वाळीत टाकल्यावर त्याला धैर्याने सामोरे जाणाऱ्या एकनाथाला जर आपण संत मानतो तर घरी भोजनाला व पूजेला ब्राम्हणच का लागावा? स्त्रीला जर स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपण मान्यता देतो तर सधवा - विधवा, परित्यक्त्या या सीमारेषा कशाला? स्त्रीचे सगळे सौभाग्य पती आणि त्याची प्रतीके याच्याशीच का निगडीत का असावे? या सगळ्या वेळा, दिवस पाळताना मासिक पाळी नसावी यासाठी गोळ्या घेऊन ती पुढे वा मागे ढकलण्याची धडपड कशाला?
संदर्भ: विचार तर कराल?
डॉ. नरेंद्र दाभोळकर
डॉ. नरेंद्र दाभोळकर
No comments:
Post a Comment