अगदी सहज पण उपहासात्मक असे वरील वाक्य आपण पावलोपावली ऐकत असतो. कोणत्याही ठिकाणी कोणीही ऐरागैरा शाहू महाराजांचा असा ' उध्दार ' करत असतो. आपणही हे उद्गार अगदी सहज घेतो. परिणामी अत्यंत स्वस्त असे हे उद्गार एका महामानवाचा कळत नकळत उपमर्द करतेय याची जाणीव आपणाला राहत नाही .
लोकराजा शाहू महाराज हे विसाव्या शतकातील अत्यंत उदार व दुरदृष्टीचा राजा. शिवछत्रपतीचा रयत जोपासण्याचा कृतीशील वारसा शाहूंनी पुढे चालवाला. आपल्या छोट्याशा करवीर संस्थानात २१ व्या शतकातही भल्याभल्यांना पचायला जड जाईल अशी कार्ये या लोकराजाने करून दाखवली. परिणामी कोल्हापूर हे नाव महाराष्ट्रात नव्हे ...देशात नव्हे ..तर जगाच्या नकाशावर ठळकपणे नोंदवले गेले. *लोकराजा शाहूचे कोल्हापूर नगरी...*असे सर्वत्र नाव दुमदुमते.
" तू काय शाहूमहाराज लागून गेलास काय ??" असे म्हणणारे मुर्ख लोकांना शाहूची कामे कदाचित ठाऊक नसावीत. *करवीर संस्थान सुजलाम सुफलाम करणारे , राधानगरी धरण बांधून देशातील पहिले धरण बांधणारे , मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काळाच्या पुढील पावले उचलणारे , बहुजनातील शोषीतांना आरक्षण लागू करणारे , शिवमंदीर उभारून जगभर शिवचरित्र पोचवणारे , कलावंत , खेळाडू , पत्रकार घडवणारे , स्त्री सन्मान राखणारे , हिंदू मुस्लिम एकता घडवून आणणारे , ब्राम्हण्यवादी शक्तीविरोधात दंड थोपटून उभे राहणारे , अडाण्याला शहाणे बनवणारे व शहाण्याला विद्वान बनवणारे आणि विद्वानला लोकहितासाठी मार्गदर्शन करणारे ....असे एक ना अनेक रुपे वर्णीता येतील.*
*आज कोल्हापूर जिल्हा सर्व बाबतीत अग्रभागी असण्याचे एक अन् एकच कारण असे की हा जिल्हाशाहूराजाच्या त्यागाने , दुरदृष्टीने पुनीत झाला आहे.*
मग प्रश्न असा की , शाहूराजाचे नाव आपल्या ओठी गौरवाने यावे की उपहासाने ?? *ज्या माईच्या लालाने शाहू महाराजांच्या नखाएवढेही लोककार्य केलेले नसते त्याने कळत नकळतपणे केलेला उपहास योग्य आहे काय ?? मला तरी हे निषेधार्ह वाटते .*
*बहुजनांच्या लेकरांनो , आता जिभेला वळण लावा. आपल्याच तोंडाने आपल्या महामानवांचा उपमर्द आपण करावा काय ?? शिवाजी बिडी..संभाजी बिडी अशी व्यसने पोचवणारे व तरुण पिढी बर्बाद करणाऱ्या उत्पादनांना बहुजननायकाची नावे ठेवून आपल्या जखमावर मीठ चोळल गेलयं. त्यावेळी आपल्या तळपायाची आग मस्तकात जातेच ना. मग....मग शाहूराजाचा उघडउघड उपमर्द आपल्या तोंडासमोर चालवून घेणार काय??* यापुढे कळतनकळतपणे ...तू काय शाहूमहाराज लागून गेलास काय ?? असे उपहासात्मक बोलणार्याना पहिल्यांदा समज द्या .समजला तर ठीक नाहीतर कोल्हापुरी पायताण हातात घ्या .
*आणी ही सुरुवात स्वतः पासून करा. चुकुनही शाहूराजा चा उपमर्द होईल असे बोलू नका , वागू नका.*
*शाहूराजा होता म्हणून आज आपण जगतोय आनंदाने . शाहूराजाविषयी कृतज्ञ रहा. युगातून एखादा असा ..राजातील माणूस , माणसातील राजा ....तयार होतो. शाहूराजाला गौरवपूर्वक अभिवादन करा. आपण सारे या लोकराजाची प्रजा आहोत याचे भान सुटू नये.*
*!! राजर्षी शाहू महाराज की जय...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २ )*
*काय..."नगरातनं " आला आहेस काय ???*
अत्यंत उपहासात्मक व हिणकस असे हे वाक्य सर्रास आपल्या तोंडी असते. छोट्या छोट्या गोष्टीवर ही थेट प्रतिक्रिया आपण व्यक्त करत असतो. पण हे व्यक्त होताना आपण कोणत्या तरी समाजाला क्षुद्र लेखतोय व स्वतः मात्र " हायफाय " असा असल्याचा वृथा अभिमान बाळगतोय याचे आपणाला भान नसते.
*" नगरातनं...या शब्दातील " सिध्दार्थ " हे नावं आपसूकच वगळलं जाते. आपल्या "हायफाय " जिभेला सिध्दार्थ हे नावं उच्चारताना थोडे जडं जात असावे. ज्या सिध्दार्थापुढे अर्थात बुध्दापुढे अखिल जग नतमस्तक होते त्याचे नावं आपल्या जिभेवर रुळत नाही हा आपला करंटेपणा आहे. डाँ. आ.ह. साळुंखे यांनी " सर्वोत्तम भुमिपुत्र " असा उल्लेख ज्या बहुजन नायकाचा केला त्याच्यातील सर्वोत्तम आपण जाणून घेण्याचा भानगडीत पडतच नाही . परिणामी आपण करंटे राहतो.*
*कोणत्याही गोष्टीला ज्या वेळी कमी लेखायचे असते....त्यातील क्षुद्रपणा दाखवायचा असतो त्यावेळी " तू नगरातनं आलायस काय ? " असा सवाल करुन छद्मीपणे हसले जाते. पण हे कुत्सित हास्य आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवायाला पुरेसे नसते. त्यासाठी आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावे लागते .*
*आहे का हिंमत आपल्यात ??.ज्या "नगराला" आपण हलके...कमी प्रतीचे समजातो त्याच प्रकारच्या नगरातून अखिल जगातील सर्वश्रेष्ठ बुध्दीवंत असा महामानव जन्माला यैतो आणि भारत देशाची राज्यघटना लिहीतो. त्याचे नाव असते डाँ. बाबासाहेब आंबेडकर . ज्या नगराला आपण नावे ठेवतो त्या नगरातील प्रत्येक घरात जगातील सर्वोत्तम भुमिपुत्र वास करतो. त्याचे नाव गौतम बुध्द. ज्या नगराला आपण नावे ठेवतो त्याच नगरातून दसरा दिवशी देवीचि मुख्य पालखी पहिल्यांदा येण्याचा मान आपल्या राजाने दिलाय. त्याचे नाव राजर्षी शाहू महाराज . ज्या नगराला आपण तुच्छ लेखतो त्याच नगरात " बहुजन "शब्दाची यथार्थ व्याख्या करुन कुटुःबासहीत तो माणूस जाऊन राहिला. त्याचे नाव वि. रा. शिंदे . ज्या नगराला आपण नावं ठेवतो तिथे आजही प्रत्येक घरात भारतीय राज्यघटनेची किमान एक प्रत असते.*
*आता बोला...माझ्या बहुजन बांधवांनो , यातील एक गोष्ट तरी आपण आपल्या परिसरात करु शकतो का ?? नगराला नंतर हिणकस ठरवा हो , पहिल्यांदा एक बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजात निर्माण करून दाखवाल का ?? करुणेचा सागर असणारा बुध्द जन्मताना आपल्या वर्णात जन्मला पण तो बुध्द होऊन त्या नगरात का जाऊन विसावला ?? उत्तर शोधा की याचे. एक रेषा मोठी करायची असेल तर पहिल्या रेषेपेक्षा दुसरी रेषा मोठी ओढावी लागते . तरच शौर्य असते. हि हिंमत आपल्यात आहे का ?? विचार करा.*
हिणकस बोलणे सोपे असते ..कठीण असते आपल्यातिल हिणकस घालवून स्वतःला सकस बनवून दाखवणे. त्यासाठी अभ्यास , कष्ट , चिकाटी ,प्रयत्न ,सातत्य हे गुण लागतात. दुसऱ्या समाजाला हिणकस व कमी प्रतीचे दाखवत बसण्यापेक्षा स्वतःच्या समाजाला सकस बनवण्याचे आव्हान पेला.
*बहुजनांनो.....ही जीभ लैलैलै वाईट्ट असते. माणसं जोडते अन् तोडतेही. या जिभेला विधायक विचारांचा व्यायाम होऊ दे. उगाचच स्वतःला स्वतः च " हायफाय " मानू नका. "जग " ठरवेल आपली किंमत . आणि हो , तिथे कुठलंही नगर हे नगर नसते...तिथे असतो फक्त एकच निकष . " बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल ".*
बघा , थोडा शांतपणे विचार करा. आपल्या महामानवांनी आपणाला एक आदर्श घालून दिलाय. *" हिणवंत होऊ नका , ज्ञानवंत व्हा ".*
*!!डाँ. बाबासाहेब आंबेडकर ...यांचा विजय असो.!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ३ )*
*आम्ही काय हातात बांगड्या भरल्यात होय ??*
रागाचे भरात अथवा एखाद्याला गर्भित इशारा द्यायचे वेळी आपण हे वाक्य सहज उच्चारून जातो. या वाक्यातून सुचित होणारा अर्थ स्पष्ट आहे की , हातात बांगड्या भरणारी व्यक्ती ही दुर्बल , नामर्द , स्वतःचे संरक्षण न करू शकणारी , परावलंबीत्व , कमजोर , भित्री वगैरे वगैरे असते. याच्या उलट अर्थ असा तयार होतो की , बांगड्या हातात न भरणारे लोक हे सबल , दणकट , बलवान , स्वसंरक्षण करु शकणारे , न भिणारे वगैरे वगैरे असतात.
*बांगड्या....हा घटक स्त्री वर्गाच्या हाती असतो. सौभाग्याचा खरा दागिणा म्हणून " हिरवा चुडा " हातात परंपरागत स्त्री वापरते. फँशन म्हणून इतर रंगीबेरंगी बांगड्याही भरल्या जातात. श्रीमंतीचे प्रदर्शन मांडण्यासाठी अथवा ऐनवेळेला उपयोगी पडणारी गुंतवणूक म्हणून ही सोन्याची बांगडी बनवली जाते. बांगड्याचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असतात.*
*आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत असे आत्मगौरवाने अथवा दांडगाईने जरा बारीक विचार केला तर अनेक प्रश्न उभे राहतात. आपण सर्वच हाताता बांगड्या असणाऱ्या आई नावाच्या बाईच्या पोटी जन्माला येतो. हातात बांगडी असणारी एखाद्या स्त्रीला आपण आपली पत्नी करून जीवनसाथी बनवतो. हाताता बांगडी असणारी मुलगी आपली बहीण म्हणून स्विकारतो. आपल्या मुलीच्या हातातही बांगड्या आपण हौसेने भरु देतो. बांगड्या हातात बाळगणारी मैत्रीणच्या हाताता आपला हात आपण विश्वासाने गुंफतो. " बांगड्या आणि प्रत्येक पुरुष " यांचे असे हे अतुट नाते आहे.*
*हातात बांगड्या असणारी गार्गी उभ्या राजसभेत ज्ञानी म्हणवणार्या याज्ञवल्क्याला निरुत्तर करते. हाती बांगड्या आसणारी जिजाऊ दोन निष्कलंक छत्रपती घडवून दाखवते. या दोन महान छत्रपतीचा वारसा हाती बांगडी वापरणारी करवीर राज्यसंस्थापिका महाराणी ताराराणी चालवते. बहुजनाचा महामानव जोतीबाच्या खांद्याला खांदा लावून हातात बांगडी घालणारी सावित्री क्रांतीज्योती बनून देशातील पहिली शिक्षिका बनते. हातात बांगड्या भरणार्या अनेक स्त्रीया देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी होत्या. हातात बांगडी असणारी इंदिरा जगातील मोठया महासत्तेला झुकवून दाखवते.असंख्य उदाहरणे आहेत स्त्री कतृत्वाची , त्यांच्या लढाऊ पणाची. तरीही तिला " बांगड्या भलाणारी " म्हणून हिणवले का जाते ??*
वरील विधान...सहज अथवा रागात वापरताना आपण आपली आई , पत्नी , बहीण , मुलगी , मैत्रीण यांचा उपमर्द करत नाही का ?? *या बांगड्या भरलेल्या आईच्या हातातच आपण आपले बालपण घालवल...आजही तोच हात क्षणभर का होईना आपल्या डोक्यावरून फिरावा असे आपणांस वाटतेच ना. आपल्या जीवनातील सुखदुःखात सदैव साथ करणारी पत्नी आपला " हिरवा चुडा " भरालेला हात आपल्या हातात विश्वासाने सोपवते तेव्हा आपण सुखावतोच ना.बांगडी भरलेली बहीण आपल्याला भाऊबीजेला ओवाळते तेव्हा आपण आनंदतोच ना. आपली मुलगी लग्नानंतर सासरी जाताना आपल्या हातात तोच बांगडी भरालेला हात ठेवते तेव्हा आपण रडतोच ना. आपली मैत्रीण आपला हात आपल्या हाती देऊन सुखदुखाच्या गुजगोष्टी करते तेव्हा बांगडी भरलेल्या त्याच हाताना अलगद थोपटून आपण तिला " मी तुझ्या बरोबर आहे " हा दिलासा देतोच ना. मग.....मग माझ्या बांधवानो कळतनकळत आपण त्याचा अवमान का करावा ??*
*बांगडी....म्हणजे पुरुषी गुलामीचे प्रतीक असे म्हणून बांगड्या न वापरणारे अनेक स्त्रीया आहेत. त्यांच्या भावनाचा योग्य मान ही राखला जावा. अशा स्त्री वर्गाची संस्था वाढायला हवी असे माझे प्रामाणिक मत आहे. इथे प्रश्न फक्त त्यांनाच आहे की...खरेच तुमच्या म्हणण्याप्रमाणे "बांगडी घालणे" म्हणजे दुर्बलता , कमजोरी , भित्रेपणा ,परावलंबीत्व असे आपण म्हणता अथवा मानता ....तर मग माझ्या बंधूनो स्त्री वर्गाला या "बेडीतून" काढण्यासाठी तुम्ही काय पावले उचलणार आहात ?? आपली आई , पत्नी , बहीण,मुलगी ,मैत्रीण यांना किती काळ या गुलामीत रखडवणार आहात ?? विचार करा.*
*बहुजनांनो , उचलली जीभ , लावाली टाळ्याला असे वर्तन करू नका. जगातील निम्मी लोकसंख्या स्त्री जातीची आहे. हे जग घडवाण्यात त्याचा वाटा मोठा आहे. त्यांचा सन्मान करुया. स्त्री पुरूष समानता आचरणात आणूया.*
*!! नारीशक्ती जिंदाबाद !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५