Flash

Saturday, 29 December 2018

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात?

नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद

प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर बसुन नेहमीप्रमाणे आजुबाजुच्या घनदाट वटवृक्षांवर  चिवचिवाट करणार्‍या माझ्या सोयर्‍यांना ऐकत होतो. सर्वच जण तिथे कायमचेच रहिवासी होतो. माझी सकाळ आणि त्यांचे वटवृक्षांमधुन चिवचिवणे हा दररौजचा उपक्रम. त्या दिवशी मात्र माझ्या मनात माहित नाही पणगेली कित्येक वर्षे मी या माझ्या मित्रांना चिवचिवाट करतांना, भांडतांना ,मारामार्‍या करतांना बघीतलेय पण आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन  कुठे आमच्या काँलनीच्या परिसरात मृतावस्थेत  पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही. हा एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षि आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.
 मग पक्षी काय अमर असतात का ? की त्यांना नैसर्गीक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे मी गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दीले नाही. अनेक पक्षी निरिक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही.

आणि मग ह्या प्रयत्नातच मला एक रंजक लेख वाचायला मिळाला "Dying pattern of Birds"
ह्या लेखात काॅर्क बिशप ल्युसी  यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय, लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच  असे आव्हान दीलेय की कुणीही जगात नैसर्गीक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा.  आजपर्यंत तरी त्याचे हे आव्हान कुणीहि स्विकारलेले नाही. लेखकाने मरण्याच्या कारणांची स्पष्ट वर्गवारी दीलिय, एकीकडे नैसर्गीक कारण दूसरीकडे शिकार, अपघात, मूद्दाम पक्षीहत्या अशी वेगळी कारणे. परंतु मजेची गोष्ट अशी की आजपर्यत तरी नैसर्गिक कारणाने मृत असा एकही पक्षी कुणी पुरावा म्हणून सादर करु शकले नाहीय,
पक्षी शास्त्रज्ञसुध्दा ह्या बाबतित ठोस सांगु शकत नाही. दरवर्षी पक्ष्यांची गणना करुन ते सरासरी पक्ष्यांचा मृत्युदर ठरवतात.
ह्या बिशप ल्युसींचा मधमाश्यांच्या जिवनक्रमावरचे संशोधन जगमान्य आहे, ते सांगतात मधमाशा मृत्यु समिप आला की खूप उंच वरच्या उच्च दबावाच्या हवेत स्वतःला घेउन जातात आणि तिथे दबावामुळे त्यांचे अक्षरशः नैसर्गीक विघटन होते आणि त्या नष्ट होउन जातात. यावरुन बीशप म्हणतात की पक्ष्यांना सुध्दा मधमाशाप्रमाणे अंतःप्रेरणेच एक इंद्रीय असावे जे त्यांना जाणीव करुन देते की आता शेवटचा क्षण आला आहे किंवा जिवनकाल संपत आलाय. आणि ही जाणिव हौताच पक्षि आकाशात स्वःतला उंच उंच घेउन जातात जो पर्यत त्यांचे विघटन होत नाही तो पर्यत ते वरती वरतीचचढत जातात. बीशप ची ही थेअरी मला तरी स्विकारार्ह वाटते  कारण दूसरे कुठलेच लाॅजिकल स्पष्टीकरण सध्या तरी नाही.
अजुनपर्यत तरी ह्या थेअरीला शास्त्रज्ञांकडुन कुठलेही खंडन झालेले नाही. ह्या एका गोष्टीवरुन आपण एक गोष्ट निश्चितच म्हणु शकतो की पक्षी मानवापेक्षा  उत्कांतीच्या पुढच्या पायरीवर आहेत की त्यांना ही जाणीव  होउ शकते की आपला अंत्यसमय आलाय जे माणसालाअजुनही अज्ञात आहे. पक्षी निश्चीत ठरवु शकतो की त्याने खूप जगुन झालेय,बघून झालेय आणि तो आनंदाने कसलिही खंत चिंता न बाळगता उंच उडून  शरीराचे  विघटन करुन टाकतो.न वयानूसार येणार्‍या व्याधी,न सोसायचे दुःख. आपल्या पेक्षा ते पुढेच आहेत कुठेही जाण्याचे, विहाराचे स्वातंत्र्य, कुठलीही सिमा नाही , पासपोर्ट नाही, पिल्ले मोठी झाली की त्यांच्यापासुन सहजगत्या स्वतःला सोडवुन परत कधीही न भेटणे सहज स्विकारणारी. आणि स्वतःच्या मृत्युची वेळ पण स्वतःच निश्चित करणारी... ........

Saturday, 20 October 2018

व्यंगविनोद आणि अश्लीलता! -मनोहर सप्रे

व्यंगविनोद आणि अश्लीलता!

ग्रंथनामा - झलक 

  • ‘मनोहारी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 06 October 2018
  • ग्रंथनामाझलकमनोहारीManohariमनोहर सप्रेManohar Sapreव्यंगचित्रकारCartoonist
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचं ‘मनोहारी’ हे नवं पुस्तक नुकतंच प्रफुल्लता प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. त्यातील हे एक प्रकरण.
.............................................................................................................................................
खूप वर्षांपूर्वी ‘सोसायटी अँड मॉरल्स’ या पुस्तकात आरंभीच उपस्थित केलेला एक सवाल व्यंगविनोदाच्या निमित्तानं डोळ्यांसमोर येतो! तो म्हणजे जिच्याविषयी सारा समाज नैतिक हाकाटी करतो ती खून, मारामाऱ्या, फसवाफसवी, शारीरिक छळ, दरोडे अशी गुन्हेगारी साहित्य आणि सिनेमाचा विषय म्हणून आम्हाला बिनदिक्कत चालते, मग त्यातल्या लैंगिकतेबाबत आम्ही एवढे हळवे आणि अनुदार होतो, ते का? एकूण व्यंगविनोदाबाबतही नेमका हाच सवाल उभा होतो, म्हणून त्याचं लैंगिकतेशी नातं काय हा प्रश्न उभा होतो!
एक गोष्ट मात्र निश्चित की, श्लील-अश्लील हा भेद मुळातच स्थळ, काळ, परिस्थिती, संदर्भ आणि व्यक्ती इतक्या विविधतेला सापेक्ष आहे. या सगळ्यात काळानुसार बदल होत जातात. मात्र कालचं अश्लील आज श्लील म्हणून दुर्लक्षित होतं. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आचार्य अत्र्यांच्या ‘ब्रह्मचारी’ सिनेमात मीनाक्षीला पोहण्याच्या पोशाखात दाखवल्यानं कोण हाहाकार माजला होता! आज स्त्रीच्या उघड्या अंगाविषयी कुणाला खंत वाटत नाही आणि वाटलीच तर उरलेल्यांविषयीच हळहळ वाटते! आज जे विनोद आणि जी व्यंगचित्रं विविध प्रसारमाध्यमांतून लोकांपर्यंत पोचतात, त्यातला एखादा पण पूर्वी बाहेर आला नसता!
श्लील-अश्लील हा निवाडा ज्या निकषावर होतो, तो म्हणजे समाजमान्यताप्राप्त लैंगिकता. वस्तुत: माणसातल्या प्राणित्वाचा एक अंगीभूत भाग म्हणून लैंगिकता हे एक निसर्गवास्तव आहे. पशुप्रमाणे त्यात नैतिक-अनैतिक असा कुठलाच मूल्यभेद नाही. पशुप्रमाणेच मुक्त व स्वैर लैंगिक संबंध संपून मानवात स्थिर असे युगुल (pair bond relation) संबंध निर्माण झाले, तेव्हा कुठे लैंगिक नियमन हा समाजव्यवस्थेचा मूलाधार झाला. आणि तेथून श्लील-अश्लील हे भेद सुरू झाले. आरंभीच्या साऱ्या समाजव्यवस्था याबाबत कडक आणि कठोर होत्या. मात्र यंत्रयुगाच्या सुरुवातीनंतर क्रमानं होत गेलेल्या शहरीकरणातून मानवी समूहात जे बदल झाले, त्यात व्यक्तिस्वातंत्र्यात जलदगतीनं होत गेलेली वाढ हा फार मोठा घटक होता! त्यातून सनातन्यांची व्यक्तिजीवनावरची पकड सैल होत गेली. या ओघात विनोदाच्या प्रांतात पाश्चात्य विनोदात मिस्किलीच्या माध्यमातून लैंगिकतेचा शिरकाव झाला आणि पुढे तिचा अश्लीलतेकडे जरा जादा झुकाव सुरू झाला. ‘परमिसिव्ह’ समाजव्यवस्थेमुळे या प्रक्रियेला जोरकस उत्तेजन मिळाल्यामुळे जागतिक पातळीवरच्या विनोदात हा गुणविशेष अनिर्बंध पाझरला. ‘प्लेबॉय’ आणि ‘मॅड’ यांसारख्या नियतकालिकांनी ब्रँड म्हणून जागतिक व्यंगविनोदाला आकार देणं हा याचा पुरावा!
अश्लील माध्यमाची एक जमेची बाजू म्हणजे त्यातून सांगितलेला विनोद समजायला विशेषसा बौद्धिक व्यायाम लागत नाही. शिवाय अधिक धारदार म्हणून जादा हास्यकारी होतो. फक्त त्यात अश्लीलतेचा अतिरेक होऊन तो बीभत्स होण्याची शक्यता वाढते. ही अवस्था टाळण्यासाठी योग्य त्या संतुलनासाठी कोणता निकष लावावा हा कूट प्रश्न निर्माण होतो. मात्र उपहासिक विनोदांबाबत अश्लीलता काही प्रमाणात क्षम्य ठरते, कारण त्यातली अश्लीलता साध्य नसून टीका म्हणून केवळ साधनीभृत असते.
व्यंगविनोदाची व्यक्ती व वर्ग सापेक्षता लैंगिकतेचा जरा जरी सार्वजनिक उल्लेख झाला तरी सनातनी अश्लीलतेची ओरड करतात. लैंगिकता आणि अश्लीलता या संज्ञा अध्येमध्ये संलग्न केल्या जात असल्या तरी तत्त्वत: त्या एक नाहीत. अन्यथा लैंगिक शिक्षणावरची पुस्तकं अश्लील ठरतील की! याचा अर्थ हा की केवळ व्यंगविनोदात लैंगिकतेचा वापर केला म्हणून तो अश्लील ठरत नाही! लैंगिकता ही मानवी प्राण्याची नैसर्गिक अशी सुप्त प्रेरणा आहे. परंपरागत सांस्कृतिक संस्कार म्हणून तिची प्रगट अभिव्यक्ती नाकारली जाते. विनोदाच्या आडवळणी माध्यमातून खुबीदारपणे ती व्यक्त केल्यावर ती हास्यकारी ठरते.
थोडक्यात वास्तवाचंच विडंबनात्मक रूपांतर म्हणजे विनोद, मग तो शाब्दिक असो वा चित्रित असो! पुरुषाला स्त्रीविषयक कायम नैसर्गिक आकर्षण असतं, हे चिरंतन वास्तव हास्यकारकतेतून अधोरेखित करणं हीच तर त्यातली व्यंग्यचित्रकारांची इच्छा आणि किमया आहे! यात कुठलीच ठळक विकृती नसल्यानं लैंगिक संदर्भ असूनही त्यात काहीएक आक्षेपकारी नाही! पुरुषी वासनेच्या वेगळेपणाच्या संदर्भातलं सोबतचं व्यंगचित्र बघा. त्यात घराची यजमानीण मैत्रिणीला म्हणते, “मला बाई हे घर मुळीच आवडलं नव्हतं, पण यांचाच हट्ट पडला ना?... म्हणे काय छान दृश्य दिसतं इथनं!” आता बोला!
जीवनमूल्यांकडे बघण्याची स्त्री-पुरुष यांची नजर व्यक्तीसापेक्ष म्हणजे संपूर्णपणे वेगवेगळी असते, हे आपण सगळे प्रत्ययही अनुभवतो. ती किती पराकोटीची भिन्न असू शकते याचा ‘रीडर्स डायजेस्ट’मध्ये आलेला एक बहारीचा किस्सा माझ्या जमेस आहे. वरवर चावट वाटणाऱ्या त्यात स्त्री-पुरुष जीवनवास्तवाची एक विलक्षण आणि धारदार अनुभूती देण्याचं सामर्थ्य आहे. नग्न चित्रकारितेत खास प्रावीण्य असलेला एक चित्रकार असतो. घरातच त्याचा स्टुडिओ असतो. तिथं नग्न मॉडेल या नात्यानं पोज द्यायला एक तरुणी त्याच्याकडे रोज येत असते. एके दिवशी ती अशीच येऊन कपडे उतरवायला लागली असता चित्रकार म्हणतो, “असू दे, आज काम बंद ठेवू या. मला बरं नाही म्हणून मूड नाही. फक्त एक कप चहा मात्र करून देशील तर बरं!” मॉडेलनं त्याप्रमाणे त्याला चहा करून दिला आणि तो तो घेत असता ती त्याच्याशी बोलत बसली. दरम्यान, गेटचं लॅच उघडल्याचा आवाज आला. तो ऐकताच चित्रकार गडबडून म्हणतो, “बाप रे! बायको आलेली दिसते?... चटकन कपडे काढ बघू!” चित्रकारी संदर्भात मॉडेलची नग्नता अक्षम्य ठरू नये, मात्र तिनं ‘वस्त्रात’ नवऱ्याला चहा करून देणं मात्र बायकोला गैर व संशयास्पद वाटावं हा निखळ विनोद नाही, तर या उपहासातून स्त्री स्वभावाची सार्वत्रिकता दर्शवणं आहे!
व्यंगविनोदाच्या प्रांतात असल्याच सापेक्षतेपायी एक मजेशीर विरोधाभास आढळतो. तो म्हणजे जिथं अश्लीलता मूळ चित्र वा मजकूर यात कणभरही नसते, तिथं नकळत वाचक वा प्रेक्षकच आपणहून ती गृहीत धरून चालतात. जसं एका छोट्याशा खाजगी ‘गेट टूगेदर’मध्ये रात्रीचे दहा वाजून गेलेत म्हणून एक तरुण विवाहिता उठून पलीकडल्या पुरुषांच्या जमावातल्या आपल्या नवऱ्याला जरा चढ्या आवाजात म्हणते, “अहो, चला की! जवळजवळ झोपायची वेळ झालीय!” त्यावर लगेच सगळ्या चेहऱ्यांवर मिस्कील हास्य झळकतं, ते मग का?
या पुढलं उदाहरण तर एक अतर्क्य अशी अफलातून वास्तव घटना आहे, दादरच्या एका बँकेत वास्तवात घडलेली! एक बाई तिथल्या काउंटरवर अकाउटंटशी तंटत असतात. त्यांच्या अकाउटंचे तपशील काही केल्या बँकेशी जुळत नसतात. तेव्हा त्या आरडाओरड करत म्हणतात- “अहो असं काय म्हणताय, जमणार नाही म्हणून! तुम्ही तुमचंच धरून बसलात तर कसं होईल? तुम्ही माझी फिगर पहा ना नीट. हवं तर मी सगळं उघडून दाखवते तुम्हाला. मग तुम्ही हात लावा. तुम्ही आधी खाली तर बघा. खालची फिगर बघा. मग तुमचं पाहा! सगळं तुमच्या हातात आहे! आपण दोघांनी बसून नीट केलं तर सगळं नीट जमेल. तुमची करायची इच्छा पाहिजे फक्त. अगदी तुम्ही माझी फिगर धरून उलटे खालून वर करत गेलात ना तरी मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही रोज करता म्हणजे आम्ही कधी केलंच नाही असं नाहीये. स्वत:च माझ्या हातांनी हे सगळे करू शकते!” तात्पर्य, यावर तुमची प्राथमिक प्रतिक्रिया काय ते तुम्हीच बघा!
व्यंगविनोदाची संदर्भ सापेक्षता!
सारे ज्याला चक्क अश्लील म्हणून शिक्का मारतील असा एक खाससा अफलातून किस्सा माझ्या जमेस आहे. तो मुद्दाम इथं देतो. विशेष म्हणजे त्यातल्या तिन्ही घटनांत परिस्थितीजन्य संदर्भ समान आहे. मात्र प्रत्येकाचं लक्ष्य म्हणजे बेअरिंग वेगवेगळं आहे. संकरित पैदाशीसाठी गाय फळवणं यासाठीचे हे सारे प्रयत्न आहेत. अश्लीलतेकडे स्पष्ट झुकलेल्या पहिल्या उदाहरणात हा प्रयोग दाखवण्यासाठी व्हेटेरनरी कॉलेजमधील प्राचार्य मुला-मुलींना एकत्र करून सर्वांना उद्देशून म्हणतात, “तुम्ही समोर जे जे दिसतं ते लक्षपूर्वक पहा आणि नंतर ते वहीत सविस्तर लिहून अखेर तुमचा निष्कर्ष नोंदवा!” तिथं एक गाय आणली जाते. पाठोपाठ एक वळू आणून तिच्यावर सोडला जातो. तो गायीभोवती फक्त चार-सहा फेऱ्या मारून स्तब्ध उभा राहतो. गायीतच काही तरी गडबड असावी हे वाटून मग दुसरी गाय आणण्यात येते, पण वळूचं पुन्हा तेच! अशा क्रमानं चार-पाच गायी बदलून होतात, पण वळूचं प्रत्येक वेळी तेच! हे पाहून प्राचार्य वैतागून प्रयोगशाळेत जाऊन एक थोरला चिमटा घेऊन येतात आणि त्यानं वळूच्या माथ्यावरचे बचकाभर केस उपटतात. तसा चिडून वळू पुढलं काम फत्ते करतो. प्रयोग संपतो, तसे विद्यार्थी नोटबुकमध्ये लिहू लागतात. प्राचार्य प्रत्येकामागे उभा राहून वाचत जातात. एका मुलीनं सर्व काही सविस्तर लिहून खाली आपला निष्कर्ष लिहिलेला असतो- “या प्रकारे आमच्या प्राचार्यांना टक्कल का आहे, हे आम्हाला समजलं!”
दुसऱ्या उदाहरणातही स्थिती तीच असते, तिथंही गायी पाठोपाठ तशाच बदलल्या जातात, पण आयात केलेल्या अमेरिकन वळूचं फेऱ्या मारणं आणि नंतर स्तब्ध होणं तसंच! अखेर वळूतच काही गडबड असावी म्हणून कॉलेजचे प्राचार्य ताबडतोब अमेरिकेत मेल पाठवून हे असं का, अशी विचारणा करतात, तेव्हा तडक उत्तर येतं की, “आम्ही वळूचा बायोडाटा काळजीपूर्वक तपासला, तेव्हा लक्षात आलं की, आम्ही चुकून तुम्हाला ‘कन्सलटंट’ पाठवलाय!”
तिसऱ्या प्रयोगातही प्रसंग व रचना तीच, फक्त तो प्रकार बघायला पती-पत्नी असं एक जोडपं गेलेलं असतं. तेथील रेतन विधी पाहून पत्नी उत्सुकता म्हणून तेथील तज्ज्ञाला विचारते, “का हो, एक वळू गायीला किती वेळा फळवू शकतो?” उत्तर येतं, “आठ-दहा वेळा!” बाई कोपरखळी मारून नवऱ्याला उपरोधानं म्हणते, “बघा हो!” नवराही बेटा चांगलाच बेरकी असतो. तो तज्ज्ञाला विचारतो, “काय हो, गाय तीच का वेगवेगळ्या?” त्यावर उत्तर येतं- “वेगवेगळ्या!’’ मग नवरा बायकोला म्हणतो, “बघ ग!”
वरील तिन्ही उदाहरणांपैकी पहिल्यात कल्पनारम्य चमत्कृतीतून निखळ हसवणं हा हेतू आहे. दुसऱ्यात ‘कन्सल्टन्ट’ या एकूण ‘निष्क्रिय’ वर्गावर उपहासिक टोमणा वा सटायर आहे, तर तिसऱ्यात फक्त विवाहितांनाच समजेल अशा बेरकी मानसशास्त्रीय वास्तवाचा मिस्किली चिमटा आहे! तात्पर्य, वरील दुसऱ्या आणि तिसऱ्या किस्स्यात अश्लीलता हे फक्त माध्यम आहे, तर पहिल्यात ते केवळ उद्दिष्ट आहे! मात्र सामान्यत: वाचक हा मूलभूत फरक विसरून त्यांना सर्रास एकाच मापानं निखळ हास्यकारीच मानतात. मुळात ही त्यांच्या रसिकतेतली उणीव आहे.
व्यंगविनोदातली सांकेतिक सूचकता!
सोबत ‘कॉल बेल’वरचं एक बहारीचं व्यंगचित्र दिलेलं आहे. त्यात कॉलबेलचं बटण म्हणून स्तनाग्राचा वापर दाखवला आहे. हीच त्यातली अश्लीलतेची झाक आहे, पण व्यंग्यचित्रकारानं केवळ आपल्या विलक्षण कल्पकतेनं तीवर मात केलेली आहे. आणि परिणाम म्हणून हे चित्र केवळ मिस्किलीत जमा झालं आहे. तात्पर्य, खाद्यान्नात मसाल्यानं जी लज्जत येते, तीच नेमकी केवळ सांकेतिक शृंगारिक लैंगिकतेनं येते.
याचा एक नमुनेदार किस्सा असा - एक पत्नी नवऱ्याला म्हणते, “शेजारच्या जोश्यांनी सिगरेट सोडली, नाही तर तुम्ही बघा, कशातही जरासुद्धा संयम नाही!” यावर नवरा तापून म्हणतो, “ठीक आहे! आता दाखवतोच तुला माझ्यात किती संयम आहे तो! आजपासून आपण वेगवेगळ्या खोल्यात झोपायचं!” लगेच तशी सुरुवात होतेही! असे दोन-चार दिवस गेल्यावर एके दिवशी रात्री नवऱ्याच्या दारावर हलकी थाप पडते. तो दार उघडून बघतो, तो बाहेर बायको उभी! नवरा विचारतो, “काय ग?” त्यावर ती उत्तरते, “अहो, जोश्यांनी सिगरेट सुरू केली की!”
थोडक्यात असं म्हणता येईल की, अश्लीलतेकडे झुकलेल्या विनोदात वा व्यंगचित्रात सांकेतिकता जेवढी सूक्ष्म तेवढा त्याचा कलात्मक दर्जा थोरला! वेगळ्या भाषेत सांकेतिकता ही एक प्रकारची अंतर्गत मर्यादा वा ‘सेन्सॉरशिप’च की! याच कोटीतलं ज्याला अभिजात म्हणता येईल, असं सोबतचं एक व्यंगचित्र. तसं पाहता छोट्या मुलाला घेऊन फिरायला निघालेले आई-बाप हे काही फार दुर्मीळ दृश्य नव्हे! पण या व्यंग्यचित्रातली खुमारी त्यातल्या तिघांच्या कपड्यांच्या डिझाईनवरून लगेच ध्यानात येईल! मुलाच्या कपड्यांवरचं चौकडीचं डिझाईन हा उघडच मातापित्याच्या लैंगिक मीलनाचा संकेत आहे, म्हणजे एक प्रकारे ती अश्लीलता असूनही संकेती तंत्रामुळे तिला हास्यकारी स्वरूप आलं आहे. आणि हीच व्यंग्यचित्रकारितेची खरी किमया!
अश्लीलता, सामाजिक-राजकीय टीकेचं एक प्रभावी माध्यम!
अश्लीलता एक अभिव्यक्ती माध्यम म्हणून फार प्रभावी असल्यानं अलीकडे विनोदातून तिचा वापर सामाजिक, राजकीय टीकाकार फार मोठ्या प्रमाणावर करू लागला आहे. सामाजिक पातळीवरचा त्याचा एक नमुना असा. घटना अमेरिकेतली! एका तरुणाचं शेजारच्या मुलीवर प्रेम असतं. आपण तिच्याशीच लग्न करणार असं तो जाहीर करतो. बापाचा या प्रस्तावाला कडाडून विरोध असतो, पण याचं कारण काय ते तो काही केल्या सांगत नाही. अखेर निकरावर येऊन मुलगा ते विचारतो, तेव्हा बाप कुजबुजत म्हणतो, “अरे, ती तुझी बहीण आहे!” हे ऐकून मुलाला पराकोटीचा धक्का बसतो आणि तो गलितगात्र होतो. त्याची ही हालत पाहून आई पाठीवर हात फिरवून त्याला म्हणते, “बेटा, तू बिनदिक्कत तिच्याशी लग्न कर... तू काही तिचा खरा भाऊ नाहीस!” आजच्या अमेरिकन समाजातल्या नैतिक घसरणीवरचा हा अप्रतिम परिणामकारी उपहास आहे! आता बोला!
कायम वादग्रस्त ठरलेल्या श्लील-अश्लील या द्वंद्वाबाबत समारोपात एवढंच म्हणता येईल की, ही बाब प्राय: ‘पुरुषार्थी’ आहे आणि याला कारण पुरुषाचं दुपेडी व्यक्तिमत्त्व, समूहात आणि खासगीत वेगवेगळं असलेलं! समूहात वावरताना माणूस कायम संभावितपणाचा मुखवटा घालून असतो. त्याच्या बोलण्या-चालण्याला अदृश्य मर्यादा असतात. मात्र हाच माणूस खासगी मैफिलीत ‘खासे’ जोक्स न कचरता सांगत असतो!
विषयासंदर्भात दुसरा एक सहसा विचारात न घेतला जाणारा मुद्दा आहे, तो म्हणजे अश्लील व्यंगविनोदांच्या प्रांतात स्त्रियांचा सहभाग जवळपास नगण्य आहे. फार तर त्यांच्याबाबत एक सुप्त ग्राहकता त्यांच्यात असू शकेल! एकूण व्यंगकारितेत स्त्रिया अभावानंच असणं हा म्हणून केवळ योगायोग मानता येत नाही! यात त्यांच्यासाठी ‘विनयभंग’ हा मुद्दा महत्त्वाचा असावा वा याला सामाजिक सेन्सॉरशिप तरी कारणीभूत असावी. मात्र असल्या सगळ्या किस्स्यांत ‘पात्र’ म्हणून स्त्री सहभाग हा अटळपणे असतोच!
विषयाच्या समारोपातला अखेरचा मुद्दा म्हणजे माध्यम म्हणून लैंगिकतेचा प्रमाणित आणि संयमित वापर गैर नसून रास्त असतो. विनोदाला अश्लीलतेचा सूचकसा हलका स्पर्श देण्यातून कितीतरी अभिजात विनोद निर्माण झालेले आहेत! त्यातला एक बेहद्द नमुना म्हणून एका फ्रेंच व्यंगचित्राचा दाखला देतो. त्यात जेमतेम दहा-अकरा वर्षांची एक बाला आपल्या नितंबांवर ब्रेसियर लावून आरशात पाठमोरी बघताना दाखवली आहे. बालवयात सर्वांनाच आपण केव्हा मोठे होऊ याची उत्सुक घाई असते. त्यातून तारुण्याच्या उंबरठ्यावर ‘फॅन्टसीज’ निर्माण होतात. कारण त्या फार सुखद असतात. प्रस्तुत व्यंगचित्रात वयात येण्याची ही उमंग मिस्किलीतून रेखाटली आहे. मुलं बऱ्याचदा खोट्या-खोट्या मिशा लावतात, तसलाच हा प्रकार! म्हणूनच माध्यम लैंगिक असूनही हे चित्र मानसशास्त्रीयदृष्ट्या अभिजात मानलं गेलं आहे!

Tuesday, 4 September 2018

साहिर अमृता व इमरोज.... प्रतीक पाटील

"जब कोई पुरुष महिलाओं की शक्तियों से इन्कार करता है तो वह अपने अपचेतन से इन्कार करता है- अमृता प्रीतम 📚 सर्वोच्च साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक व कवियत्री पदमविभूषण अमृता प्रीतम यांची आज ९९ वी जयंती, नुकतीच 'बीबीसी हिस्ट्री'ने जग बदलणाऱ्या १०० महिलांच्या यादीत भारतातील मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी आणि अमृता प्रीतम यांचा समावेश केलाय फक्त यावरून त्यांची उंची कळावी.
वयाच्या १६ व्या वर्षी जिचं पहिलं पुस्तक आलं, व त्याच वर्षी तिच्याहून थोराड संपादक असलेल्या व्यसनी माणसाबरोबर लग्न झालं,दोन आपत्य झाली नंतर ते लग्न काही दिवसात मोडलं. पुढे साहिर लुधियानवी या शायरवर केलेले व साहिरने देखील केलेलं अव्यक्त प्लेटोनिक प्रेम. पुढे जाऊन नियतीने वेगळे झाल्यावर वयाच्या चाळिसाव्या वर्षी आपल्याहून सहा वर्षांनी लहान अश्या चित्रकार इमरोजबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या अमृता प्रीतम. वयाच्या 86 व्या वर्षी त्या गेल्या (31 August 1919 – 31 October 2005) तोपर्यंत जवळपास १०० एक पुस्तक व अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर होते.त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान. पंजाबी साहित्यातील सर्वोच्च प्रतिभा म्हणून त्या कायम स्मरणात
राहतील.
साहिर साब व अमृताजी दोघेही लाहोरचे, साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते. साहिरबद्दल लिहिताना अमृता प्रीतम एके ठिकाणी म्हणतात- "साहिर आणि माझ्यात नि:शब्दतेचं एक अनोखं नातं होतं. त्यात शारीरिक ओढीचा अंश नव्हता. मला ‘आखरी खत’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झाल्यावर एका प्रेस रिपोर्टरनं मी लिहीत असतानाचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे तो फोटो काढून निघून गेल्यावर मी त्या कागदाकडे पाहिलं, तर त्यावर ‘साहिर.. साहिर.. साहिर’ हा एकच शब्द मी अनेकदा लिहिला होता. माझ्या त्या वेडेपणाचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी तो फोटो प्रसिद्ध झाला. पण तो कागद कोरा असल्यासारखा भासत होता. साहिर आणि माझ्यातलं नातं तेव्हाही नि:शब्दच होतं. आणि अखेरपर्यंत ते तसंच नि:शब्द राहिलं.
दिल में एक चिंगारी डालकर
जब कोई सांस लेता है
कितने अंगारे सुलग उठते हैं
तू उन्हें क्यों नहीं गिनती
साहिर एकदा लाहोरला अमृताजींच्या घरी आले होते. दोघे फक्त एकमेकांना पाहत राहिले काहीही न बोलता, साहिर एकापाठोपाठ एक अश्या सिगारेट मारत राहिला होता इतका की अर्धी खोली त्याच्या अर्धवट राहिलेल्या सिगारेटच्या थोटकांनी भरून गेली. तो गेल्यावर त्यांनी ती थोटकं जमा केली व नंतर रोज ओढू लागल्या. त्या म्हणत असं वाटतं की जणू साहिर त्यांच्या हातात हात घालून आहे. तिला जणू साहिरच चं व्यसन लागलं होतं. तिनं लिहलंय की,
यह आग की बात है, तूने यह बात सुनाई है
यह जिंदगी की वही सिगरेट है,जो तूने कभी सुलगाई थी
चिंगारी तूने दी थी, यह दिल सदा जलता रहा
वक्त कलम पकड़ कर, कोई हिसाब लिखता रहा
जिंदगी का अब गम नहीं, इस आग को संभाल ले
तेरे हाथ की खेर मांगती हूं, अब और सिगरेट जला 🕯️
त्यांची पहिली भेट एका मुशायरा ( कवी संमेलन) मध्ये झाली होती, अमृताजी त्यांच्या शायरीच्या व ओघानेच त्यांच्या प्रेमात पडल्या. त्या दिवशी पाऊस होत होता घरी आल्यावरही त्या मंत्रमुग्ध झाल्यासारख्या होत्या ती जादू काही केल्या उतरत नव्हती. त्यावर त्यांचं सुंदर भाष्य त्यांच्याच शब्दात :
मुझे नहीं मालूम के साहिर के लफ्जो की जादूगरी थी या उनकी खामोश नजर का कमाल था लेकिन कुछ तो था जिसने मुझे अपनी तरफ खींच लिया। आज जब उस रात को मुड़कर देखती हूं तो ऐसा समझ आता है कि तकदीर ने मेरे दिल में इश्क की बीज डाला जिसे बारिश खी फुहारों ने बढ़ा दिया.
एकदा जयदेव साहिर यांच्या घरी आले होते, त्यांना टेबलावर एक चहाचा कप कित्येक महिने न धुतल्यासारखा बुरशी लागून असलेल्या अवस्थेत पडून होता. तो घाण कप फेकावा म्हणून जयदेव हात लावणार तेवढ्यात साहिर म्हणाले " तो तसाच ठेव, ती अमृताची आठवण आहे. ती आली होती तेव्हा तिने यात चहा पिला होता."
साहिर आजन्म अविवाहित राहिले. असं म्हणतात की साहिरची आईला त्यांचं प्रेम काही मान्य नव्हतं. काय कारण असेल ते असो, हे प्रेमी काही कधी लौकिक अर्थाने एकत्र आले नाही. एकदा अमृताजी साहिर यांच्या घरी गेल्या होत्या, त्या त्यांच्या आईला भेटून गेल्यावर साहिर आईला म्हणाले की " आई ही मुलगी तुझी सून झाली असती "
साहिर यांची शायरी व गाणीही बरीचशी या अव्यक्त नात्यावर आधारित आहे. भारताचा हा सर्वोत्तम गीतकार आपल्या गाण्यातून यावर लिहून जातो की :
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा
चलो इक बार फिर से अज़नबी बन जाएँ हम दोनों
हा लेख बराच मोठा झाला आहे, तेव्हा साहिर व अमृताजी यांच्या विषयावर इथेच थांबतो.
इमरोज व अमृताजी यावर परत कधीतरी ............#प्रP
साहिर मेरे जिंदगी के लिये आसमान है
और इमरोज मेरे घर की छत - अमृता प्रीतम






"आपण दोघे चीनला जाऊ" साहिर अमृताला म्हणाला.
आश्चर्य वाटून तिनं विचारलं की " आपण चीनला जाऊन काय करणार ? "
" काय म्हणजे आपण तिथं शायरी करु "
" शायरी तर आपण इथे ही करू शकतो "
"हो पण आपण तिथं गेलो आणि कधी परत आलोच नाही तर"
ही अब्दुल हाई उर्फ साहिरची पद्धत होती प्रपोज करण्याची,म्हणजे तिथंच स्थायिक होऊ आपण दोघे असं. #प्रP
इतकं सगळं असून दोघे एकत्र का आले नाही, याचं उत्तर मला असं वाटतं की साहिरला Oedipus Complex होता. आईप्रति प्रचंड प्रेम व वडिलांच्या विषयी अतिशय द्वेष. लुधियानाचे जमीनदार असलेले फझल मोहम्मद (वडील) यांच्या त्रासाला कंटाळून सरदार बेगम (आई) वेगळी झाली, वडिलांनी नंतर दुसरं लग्न केलं मात्र मुलाचा ताबा आपल्याकडे रहावा म्हणून आईला कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या. पुढे ते लाहोरला (१९४३) आले, पुढे १९४९ ला मुंबईत. गरिबीत आईने त्याला वाढवलं. साहिर हे सर्व पाहत होता. त्याच्या आईचा त्याच्या जीवनावर प्रचंड प्रभाव होता. काही असंही म्हणतात त्याचा आई मुळेच तो एकटा राहिला.
लाहोरला रात्री अमृताला तिच्या घरी भेटायला जाणारा किंवा दिल्लीत भरलेल्या पहिल्या एशियन रायटर्स कॉन्फरन्समध्ये प्रतिनिधींच्या कोटावर लावण्यात आलेल्या नावांच्या बिल्ल्यांची अदलाबदल करून स्वत:च्या कोटावर ‘अमृता’ आणि अमृताच्या कोटावर ‘साहिर’ नावाचा बिल्ला लावणारा साहिर यांची प्रेम कहाणी साहिरने कधी स्पष्टपणे पुढाकार घेऊन किंवा सांगून पूर्ण केली नाही. तो निःशब्द राहिला.
बरं अमृता का दूर गेली ? इमरोजबरोबर का राहू लागली. इमरोजच्या पाठीवर साहिर साहिर लिहिणारी दूर गेली कारण साहिर १९५० दरम्यान चित्रपटात नशीब आजमावून पाहायला आलेली गायिका १८ वर्ष्याची तरुणी सुधा मल्होत्रा हिच्यावर भाळला होता. तिला काम मिळवून देण्यात याचाच हात होता. साहिरचीच गाणी तिने सर्वाधिक गायली यावरून कळून यावं. साहिर दररोजच तिला सकाळी कामानिमित्त फोन करत, सुधा मल्होत्राचा काका त्याचा फोन आला की म्हणत आली तुझी गुड मॉर्निंग ची बेल. १९६० मध्ये इंडस्ट्रीत जेव्हा यांच्या चर्चा अफवा पसरू लागल्या त्याच दरम्यान चित्रकार इमरोज अमृताच्या एका पुस्तकाच्या कव्हर बनवण्याच्या निमित्ताने भेटू लागला होता व साहिरच्या अफवा ऐकून अमृताजी या इमरोजकडे साथीदार म्हणून पाहू लागल्या असाव्यात.
सुधा मल्होत्रा यांना नंतर विचारलं होतं की तुमचं त्यांच्यावर प्रेम होतं का ? तर यावर सुधा बोलल्या की त्यांनी साहिरला त्या नजरेने पाहिलंच नाही. पुढे सुधा मल्होत्रा यांचं गिरीधर मोटवणी यांच्याशी लग्न झालं. पद्मश्री सुधा मल्होत्रा यांनी मराठीत शुक्रतारा मंद वारा व अशी अनेक भावगीतं देखील गायली आहेत. स्त्रियांकडे आकर्षित होणारे साहिर कोणाजवळचं आपलं मन मोकळं करू शकले नाही, अबोल स्वभाव व आईप्रति आत्यंतिक काळजीने ते एकटेच राहिले असावे.
१९६४ साली जेव्हा अमृताजी व इमरोज त्यांना भेटायला मुंबईला आले तेव्हा साहिर म्हणाले :
महफिल से उठकर जाने वालो
तुम लोगों पर क्या इल्जाम
तुम आबाद घरों के वासी
मैं आवारा और बदनाम.
कारण काय असेल तर असो साहिर अमृता यांचं प्रेम सफल व्हायला हवं अशी सर्वांची मनोमन इच्छा असली तरी नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. इमरोज म्हणतो की, ‘‘साहिर नज्म से बेहतरीन नज्म तक पहुँचे. अमृता कविता से बेहतरीन कविता तक पहुँची. लेकिन दोनों जिंदगी तक न पहुँचे’. इमरोजला एकदा विचारलं होतं अमृता खरंच साहिरच्या प्रेमात होती का ? तर त्यावर तो म्हणाला की "ते दोघे एकमेकांवर खरंच प्रेम करीत नव्हते, साहिर जेव्हा मुशायरा असेल तेव्हाच दिल्लीत येत, व अमृता कधी मुंबईला गेली नाही जिथे साहिर राहत होता. साहिर हा कौटुंबिक जवाबदारी घेणारा माणूस नव्हता,हे अमृताला कळालं होतं "
कदाचित इतर मोठमोठ्या प्रेमकहाण्याप्रमाणे यांचं प्रेम आधुरं राहिलं म्हणूनच ती अमर कहाणी झाली, नाहीतर तो सर्वसामान्य संसार झाला असता. असो साहिर म्हणतो त्याप्रमाणे :
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा
(मागील लेख माझ्या वॉलवर ३१ ऑगस्टला लिहिला आहे)
पुढील लेख अमृता इमरोज वर .....................



ड्रायव्हर इमरोज असा पुकारा झाला की इमरोज गाडी घेऊन येत, अमृता प्रीतम या राज्यसभेच्या खासदार होत्या तेव्हा त्यांना घेऊन जाणे व आणणे हे काम इमरोज करत. अमृता येईपर्यंत त्यांना सोडल्यावर ते गाडीत बसून राहत तेव्हा लोकांना माहीत नव्हते की इमरोज कोण आहेत आणि ते ही कोणाला सांगण्याच्या भानगडीत पडले नाहीत. दिल्लीतील कुठल्या दूतावासात जर अमृताला आमंत्रण असेल तर इमरोज त्यांना गाडीने सोडवत मात्र स्वतःला आमंत्रित केले नसल्यामुळे ते आत जात नसत, हळू हळू सगळ्यांना कळाले की ते त्यांचे सखा आहेत तेव्हा त्यांनाही आमंत्रित केले जाऊ लागले.
हा सिलसिला सुरू झाला तो १९५७ साली जेव्हा अमृताजी यांनी सेठी नामक चित्रकाराला आपल्या "आखरी खत" या पुस्तकाचे कव्हर बनवण्यास सांगितलं होतं. त्यांनी शमा मासिकात काम करणाऱ्या इंद्रजित उर्फ इमरोजचं नाव सुचवलं, हा माझ्यापेक्षा चांगलं काम करेल म्हणून. इमरोज तेव्हा दिल्लीत साऊथ पटेल नगर व अमृताजी वेस्ट पटेल नगर मध्ये राहत, इमरोज ते आठवताना म्हणतात की त्यांना पुस्तकाचं डिझाईन आवडलं आणि आर्टिस्ट देखील. काही दिवसांनी इमरोजचा वाढदिवस आला, तेव्हा अमृताला ते म्हणाले की माझा आज वाढदिवस, आमच्या गावाकडे कोणी वाढदिवस साजरा करत नाही मी ही कधी साजरा केला नाही. त्यावर अमृताजी बाहेर गेल्या व केक घेऊन आल्या. केक खाऊन झाल्यावर दोघे एकमेकांना बघत राहिले.
हळूहळू अमृताच्या घरी इमरोज रोज येऊ लागला, अमृताजी यांच्या १० व ११ वर्ष्याच्या मुलांना ते शाळेत स्कूटरवर घेऊन जाऊ लागले. एकदा ट्रिपल सीट वरून पोलिसांनी पावती फाडली, तेव्हा दोघांनी मिळून एक कार घेतली. १९५८ साली इमरोजला गुरुदत्त ( अभिनेता/ दिग्दर्शक) कडे काम लागलं, मानधनावरून गाडी आडली होती. इमरोज मुंबईला जाणार म्हणून अस्वस्थ होऊ लागल्या होत्या, तोंडाने मात्र एक शब्दही बोलत नव्हत्या. तीन दिवस राहिले तेव्हा " हे तीन दिवस मला माझे शेवटचे तीन दिवस वाटत आहे" म्हणाल्या. इमरोज मुंबईत गेल्यावर अमृताला ताप आला, हे कळल्यावर इमरोजदेखील हातातलं काम सोडून परत आला. त्याला रेल्वेतून उतरताना पाहताच त्यांचा ताप गेला. इमरोज मात्र त्यानंतर कधीच त्यांना सोडून गेला नाही.
भारतातील जाहीररीत्या एकत्र राहणारं हे पहिलं लिव्ह इन रिलेशनशिप जोडपं असावं. आपल्याहून वयाने आठ वर्षे लहान इमरोजबरोबर त्या एकाच छताखाली राहत असल्या तरी वेगवेगळ्या खोलीत ते झोपत. यावर इमरोजला कोणी छेडलं तर तो म्हणत की आम्हाला एकमेकांचा सुगंध येतो तेवढंच पुरेसे नाही का ? अमृता रात्री एकांतात लिहीत बसत, इमरोज मात्र लवकर झोपी जात. रात्री एक वाजता मात्र ते उठून अमृताजी यांना चहा बनवून देत. त्यांच्या लिखाणाच्या टेबलावर चहा ठेवून येत, अमृताजी लिखाणात इतक्या गर्क असत की त्या त्यांच्याकडे पाहत देखील नसत. इमरोजच्याच शब्दात " मर्द ने औरत के साथ अभी तक सोना‌ ही सीखा है, जागना नहीं, इसलिए मर्द और औरत का रिश्ता उलझनों का शिकार रहता है " हा सिलसिला चाळीस पन्नास चालत राहिला होता. समाज काय म्हणेल याची पर्वा दोघांनीही केली नाही, अमृताजी तर लहानपणापासूनच बंडखोर होत्या. इमरोज अमृताला म्हणाला की माझा समाज तू आणि तुझा समाज मी. बस्स का पर्वा करावी.
अगदी अमृताजी यांच्या शेवटच्या काळात देखील त्या एकदा बाथरूममध्ये घसरून पडल्या, त्यांच्या मांडीचं हाड मोडलं तेव्हा त्यांना उभं राहणं देखील अवघड झालं होतं. त्यावेळेस इमरोज त्यांना अंघोळ घालण्यापासून ते त्यांचे कपडे बद्लण्यापर्यंत सर्व काम करीत. अमृताजी यांच्या पतीला देखील त्यांनी वय झाल्यावर घरी आणलं होतं.
स्कूटरवरून जाताना सुरवातीच्या काळात अमृताजी बोटाने साहिर हे नाव इमरोजच्या पाठीवर लिहायची, इमरोजला ते कळत मात्र तो शांतपणे अमृताला समजून घेत. अमृता म्हणत की त्याने मला व माझ्या वेडेपणाला समजून घेतलं. त्याने माझा भूतकाळ स्वीकारला होता. माझं दुःख हे त्याने त्याचं दुःख म्हणून आपलं बनवणं हे त्याला माझ्यासाठी देव बनवतं. इमरोज एकदा बोलला होता, आम्ही एकमेकांना कोणताही शब्द दिला नाही की आणाभाका घेतल्या नाहीत. कोणतेही प्रश्न केले नाहीत की उत्तरं दिली नाहीत, परंतु प्रेम मात्र फुलत गेलं. अमृताजी व इमरोज एका निरपेक्ष धाग्याने बांधले गेले होते, इमरोज प्रेमी म्हणून साहिर व अमृताजी यांच्याहून अधिक वरचढ मानला गेला कारण प्रेम हे फक्त काही घेणं नसून देणंही आहे. संपूर्ण समर्पण हे ज्याला आलं तो अव्वल ठरतो. प्रतिभेने अमृता व साहिरहून कमी असलेला इमरोज अव्वल प्रेमी म्हणूनचं अढळ आहे. #प्रP
अमृताजी यांना जेव्हा शेवट जवळ आला हे कळालं तेव्हा त्यांनी इमरोजसाठी एक कविता लिहिली होती
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं
शायद तेरे कल्पनाओं
की प्रेरणा बन
तेरे केनवास पर उतरुँगी
या तेरे केनवास पर
एक रहस्यमयी लकीर बन
ख़ामोश तुझे देखती रहूँगी
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं
या सूरज की लौ बन कर
तेरे रंगो में घुलती रहूँगी
या रंगो की बाँहों में बैठ कर
तेरे केनवास पर बिछ जाऊँगी
पता नहीं कहाँ किस तरह
पर तुझे ज़रुर मिलूँगी
या फिर एक चश्मा बनी
जैसे झरने से पानी उड़ता है
मैं पानी की बूंदें
तेरे बदन पर मलूँगी
और एक शीतल अहसास बन कर
तेरे सीने से लगूँगी
मैं और तो कुछ नहीं जानती
पर इतना जानती हूँ
कि वक्त जो भी करेगा
यह जनम मेरे साथ चलेगा
यह जिस्म ख़त्म होता है
तो सब कुछ ख़त्म हो जाता है
पर यादों के धागे
कायनात के लम्हें की तरह होते हैं
मैं उन लम्हों को चुनूँगी
उन धागों को समेट लूंगी
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं
मैं तुझे फिर मिलूँगी!!
(हा साहिर अमृता व इमरोज यांच्यावरील तिसरा व अंतिम लेख आहे, अगोदरचे दोन लेख📚 माझ्या वॉलवर आहेत)



Tuesday, 24 April 2018

मला माफ करा डॉ. दाभोळकर हेरंब कुलकर्णी ....

हेरंब कुलकर्णी ....मला माफ करा डॉ. दाभोळकर

मला माफ करा डॉक्टर
दाभोळकर

तुम्ही गेल्यानंतर मी श्रद्धांजली सभेला गेलो नाही 
मोर्च्यात ही गेलॊ नाही 
अपराधी भावनेने मन भरून आलय 
तुमच्या १८ वर्षाच्या लढाईत मी काहीच का केलं नाही

समुद्राने पिल्ल नेलेल्या टिटविच्या आकांताने तुम्ही ओरडताना मी समुद्राचे सौदर्य बघत राहिलो
कधी ना तुमच्या आंदोलनात आलो … आंदोलनाच्या बाजूने लेख सोडाच साधे वाचकांचे पत्रही लिहिले नाही
फक्त तुम्ही भेटल्यावर हवापाण्याच्या गप्पा माराव्यात तशी विधेयकाची चौकशी करत राहिलो
क्रिकेटचा सामना बघावा तसा सरकार विरुद्ध अनिस ही लढाई बघत राहिलो

प्रत्येक ख्रिस्ताला आपला क्रूस आपल्यालाच वाहून न्यावा लागतो …हे लढाईच्या बाबतही खरे असते का ….?

तुम्ही आम्हाला हवे होता ।महा रा ष्ट्र फाउन्देशनसाठी साधनेसाठी व्याख्यान मालांसाठी माझ्या पुरोगामी प्रतिमेला झळाळी देण्यासाठी……यासाठी मला तुमची मैत्री हवी होती ….तुमच्या लढाई शी मला काहीच घेणे नव्हते

मंत्रालयाच्या पायरया दर अधिवेशनापूर्वी तुम्ही एकटेच चढत होता
आणि अधिवेशन संपल्यावर विधिमंडलातुन एकटेच पायरया उतरत होतात …।
मी मात्र मोजत होतो वर्षे क्रिकेट्च्या सामन्या सारखी

तुम्ही गेल्यावर रस्त्यावर उतरलेल्या गर्दी च्या एक दशांश गर्दी तेव्हा जरी उतरली असती तर तुमची तडफड तगमग कारणी लागली असती

तुमच्या मरणाची ब्रेकिंग न्यूज संपल्यावर तुमची जिवंत पणी उपेक्षा करणारे आम्ही खरच लढणार आहोत का ।?

आता आम्ही म्हणतो आहोत गोळीने विचार संपत नाही
असेच आम्ही म्हणालो होतो गांधीला संपवल्यावर
असेच आम्ही म्हणालो होतो सफदर हाश्मीला संपवल्यावर
असेच आम्ही म्हणालो होतो शंकर गुहा नियोगीला संपविल्यावर …

पण आज वास्तव काय आहे डॉक्टर
मोदीमय गुजराथेत गांधी कुठे शोधायचे
सफदर हाश्मीचे राजकीय नाटक कोणत्या रस्त्यावर बघायचे
भांडवलदार आणी नक्षल वाद्यांनी वाटून घेतलेल्या छत्तीसगढ मध्ये नियोगी कुठे शोधयाचे

आपल्या महान परंपरेनुसार जिथे गावोगावी तुम्ही शिव्या खाल्या तिथे आता तुमच्या साठी गावोगावी हार आहेत
तुमचा स्मृतिदिन तुमचे स्मारक तुमच्या नावाने पुरस्कार हे सारं यथासांग साजरे आम्ही करू
तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्हाला १८ वर्षे ज्यांनी तळ तळ करायला लावली त्यांच्याकडून आम्हाला तुमचे मोठेपण ऐकावे लागेल….

डॉक्टर
मला लाज फक्त याची वाटते की १८ वर्षे तुम्ही लढताना मी निष्क्रिय जिवंत होतो
तुम्ही असहाय्य पणे मारले जातांना मी जिवंत होतो ……

हेरंब कुलकर्णी
९२७०९४७९७१

…तू लेख का छापत नाय - हेरंब कुलकर्णी

“…तू लेख का छापत नाय”

   
5
महाराष्ट्र टाइम्स ने पेज थ्री टाइप बदल केले तेव्हा त्यावर टीका करणारा ‘बाळशास्त्री जांभेकरांना अनावृत्त पत्र ‘ हा लेख मी लिहिला होता. तो राग डोक्यात ठेवून आजचे संपादक अशोक पानवलकर यांनी माझे लेखन महाराष्ट्र टाइम्स मध्ये छापणे बंद केले. या असहिष्णुतेवर चर्चा व्हायला हवी यासाठी त्यांना लिहिलेले पत्र मी सोबत जोडले आहे. राजकारण्यांना सहिष्णुता शिकविणारे हे संपादक यांनी असे अनेकांना लिहिणे बंद केल्याचे समजते. त्यांनी  पत्राला उत्तरही दिले नाही.केवळ टीका करणारा लेख लिहिला म्हणून छापायचे नाही महाराष्ट्राच्या उदारमतवादी परंपरेला अशी वृत्ती घातक आहे ..
प्रिय अशोक पानवलकर,
हेरंब कुलकर्णीचा नमस्कार
यापूर्वी मी तुम्हाला २ पत्र किमान १० वेळा फोन व १० sms केले.. तुम्ही प्रतिसाद दिला नाही. पत्र फोन व sms याला तुम्ही प्रतिसाद देत नसल्याने हे शेवटचे पत्र मी लिहितो आहे. इतक्यावेळा केलेल्या पत्र फोनला प्रतिसाद न देणे हे माणूस म्हणून मला खूप अपमानकारक वाटले.
तुम्ही संपादक झाल्यापासून तुम्ही माझे लेखन छापत नाही. याबाबत तुम्हाला थेट विचारणा केल्यावर आता उत्तर ही देत नाही. शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत या विषयावर ४५ गावामध्ये जाऊन तिथले मुलांच्या लग्नाचे वास्तव मांडणारा लेख तुमच्याकडे मी पाठवला.आज ग्रामीण महाराष्ट्रात ही गंभीर समस्या आहे. आमचा हेतु हा असतो की तुमच्या  माध्यमातून हा विषय राज्याचे धोरणकर्ते,साहित्यिक ,विचारवंत यांच्यापर्यंत जावा आणि या प्रश्नाची कोंडी फुटावी. पण आम्ही इतके कष्ट घेवून हा विषय पुढे आणूनही तुम्ही जागा दिली नाही.त्याची बातमी करतो असे मला कळवले पण अशी बातमीही केली नाही. हा प्रकार नेमका काय आहे ? म्हणजे हे असले विषय तुम्हाला लेख सोडा तर बातमीच्याही लायकीचे वाटत नाहीत का ? एका एका गावात आज १०० मुले बिनलग्नाची आहेत आणि त्याची तुम्ही दखल ही घेणार नाही.
सकाळ या आमच्या अभ्यासावर अग्रलेख लिहिते.लोकमत पुरवणीचा मुख्य विषय करते. चॅनल चर्चा करतात आणि तुम्हाला बातमीचा ही विषय वाटत नाही ??  संपादक म्हणून तुमचा नाकारण्याचा नक्कीच हक्क आहे पण गेली अनेक वर्षे तुम्ही ज्याप्रकारे माझे लेखन नाकारत आहात त्या तुमच्या मानसिकतेचा माझ्याविषयीच्या आकसाचा हा मला भाग वाटतो.  खरं तर तुमची माझी ओळख ही नाही. पण संपादक झाल्यापासून तुम्ही असे का वागता याचे कारण नंतर लक्षात आले.
महाराष्ट्र टाइम्स ने पेज थ्री कल्चर सुरू केले. चित्रपट,फॅशन,गणपती,नवरात्र साड्या हे सुरू केल्यावर त्याविरोधात मी ‘बाळशास्त्री जांभेकरांना अनावृत्त पत्र’ असा एक लेख लिहिला होता. खरे तर तुम्ही तो लावून घेण्याचे काहीच कारण नव्हते. तो धोरणावर टीका करणारा होता पण तो राग धरून संपादक झाल्यावर तुम्ही मला काळ्या यादीत टाकले. खरे तर टाइम्सने जे बदल केले ते तुम्हालाही खटकायला हवेत पण तुम्ही माझ्यावर राग काढलात.
काही मुद्दे लिहितो
१)  एका संस्थेने माझ्या मुलांच्या प्रश्नावरचा लेख तुमच्याकडे पाठविला. तुम्ही स्पष्टपणे ‘त्यांचा लेख आमच्याकडे चालणार नाही’ असे सांगितले. त्या संस्थेने मला दुसरीकडे लेख देताना अगदी सहजपणे ही अडचण सांगितली. तेव्हा मला तुम्ही माझा तिरस्कार करता मला नाकारता आहात हे प्रथम कळाले.
२)  ५ वर्षात किमान २० पेक्षा जास्त लेख व लिहिण्याचे विषय मी विविध तुमच्या सहकार्‍याकडे पाठविले. तुमचे सहकारी स्पष्ट बोलत नाहीत मला कारण सांगत नाहीत. ते लेख नाकारण्याचे कारण सांगू शकत नाहीत पण तुमचा माझ्याविषयीचा दृष्टिकोन माहीत असल्याने ते घेत नसावेत. त्यामुळे हा लेख मी थेट तुम्हाला पाठवला पण तो ही नाकारला तेव्हा माझा संशय खरा ठरला.
३)  सर्वात वाईट  वाटले ते, मी पुस्तक दिनानिमित्त राज्यातील मान्यवरांच्या जीवनावर प्रभाव टाकणारी पुस्तके अशी यादी मी तयार केली. सोशल मीडियातून ७०० जणांची मते घेवून स्वत: ५००० रुपये खर्च करून यादी प्रसिद्ध केली पण पाठपुरावा करून बातमी सुद्धा आली नाही. इतके कष्ट घेऊन साधी बातमी सुद्धा तुम्ही येवू दिली नाही. तेव्हा खूप वेदना झाल्या वाचनसंस्कृती वाढावी म्हणून आम्ही ग्रामीण भागात काही प्रयत्न करतो आणि तुम्ही व्यक्तिगत तिरस्कार करता.
४)  यावर मी तुमच्याशी बोललो तेव्हा तुम्ही म्हणाला की मी कोणत्याही विषयात नव्या लोकांना संधी देतो. शिक्षणात हे मान्य आहे पण नव्यानेच लिहिण्याचा निकष लावला तर या निकषावर मी लिहिलेला शेतकरी प्रश्नावरचा लेख मी नव्यानेच लिहितो आहे. दारूबंदी विषयावर मी नव्याने लिहितो पण मग तिथे तुम्ही माझे लेख नवीन लेखक म्हणून का छापत नाही?  म्हणजे केवळ मला टाळण्यासाठीच हे निकष सांगता असे वाटते.
५)  मी लोकसत्तात लिहितो म्हणून घेत नसाल असे म्हटले तर दोन्हीकडे लिहिणारे मी अनेक नावे दाखवून देईन. आणि लोकसत्तात वर्षात जास्तीत जास्त २ ते ३ लेख माझे सध्या येतात म्हणून असे वागणार ?
६)  आमची अडचण समजून घ्या. आपले नाव यावे ही प्रेरणा शेकडो लेख आणि ९ पुस्तके प्रसिद्ध झाल्यावर संपली आहे आता प्रत्यक्ष सामाजिक काम करताना काही प्रश्न पुढे न्यावेत यासाठी आम्ही लिहितो. एखाद्या धोरणात्मक विषयावर मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही  मुंबईच्या पेपरमध्ये लिहितो. चॅनलमध्ये विषय मांडतो. त्यामुळे आम्ही आग्रह धरतो. पण ती आमची कार्यकर्ता म्हणून तगमग तुम्ही लक्षात घेत नाही. लोकसत्ता,सकाळ,लोकमत आमची ही भावना समजून घेतात पण तुम्ही नाही.
एखाद्याचे लेखन छापायचे नाही असे ठरविणे ही असहिष्णुता आहे. आपण मोदीभक्तांना असहिष्णु म्हणणार आणि दुसरीकडे तुमच्या धोरणावर टीका करतो म्हणून आम्हाला दूर ठेवणार हे योग्य आहे का ? माणूस म्हणून तुम्ही कोणाशी कसेही वागू शकता पण संपादक म्हणून तुम्ही असा भेदभाव करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आमच्यावर टीका करता मग कशाला आमच्याकडे लिहिता असे म्हणत असाल तर ते चालणार नाही. टीका करण्याचा आणि अभिव्यक्तीचा दोन्ही अधिकार लेखक म्हणून असला पाहिजे… या न्यायाने मग कशावरच टीका करता येणार नाही.
तुम्ही छापले नाहीतर दुसरे कोणीतरी छापणार आहेच. लेखन छापले जाणे माझ्यासाठी समस्या नाही, तुम्ही नाकारल्याने काहीच फरक पडत नाही. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे व नियतकालिके अतिशय सन्मानाने माझे लेखन छापतात. पण मला काही लेखक असे दूर टाकणे, संपादक म्हणून उदार मनाचे नसणे आकस ठेवणे  ही तुमची असहिष्णुता विलक्षण क्लेशदायक वाटते
कुमार केतकरांचे उदाहरण देतो. शरद जोशींशी मतभेद होते. जोशीच्या ७५ व्या वाढदिवसाला मी शरद जोशींची मुलाखत घेतली. केतकरांनी वाचक पत्र रद्द करून पूर्ण अर्धे पान ती छापली. हा उदारमतवाद तुम्ही शिकावा अशी तुमच्यापेक्षा लहान असूनही सांगतो. तुम्ही असे अनेकांशी वागत आहात. मराठी पत्रकारितेच्या उदारमतवादी परंपरेला तुम्ही असहिष्णु वळण देत आहात. आज माझे लेख न छापण्याचे समाधान तुम्हाला मिळेल पण माझ्यातला लेखक तुम्ही थांबवू शकणार नाही. तुम्ही उद्या निवृत्त व्हाल पण माझ्या मनात मात्र हे कायम राहील की एक संपादक आपल्याशी इतक्या वाईटरितीने वागले… मी सर्वत्र लिहितो पण गेल्या २० वर्षात असे संपादक मी प्रथमच पाहत आहे.
मी हा विषय अतिशय गंभीरपणे घेतला असून ही असहिष्णुता सांस्कृतिक आणि पत्रकारितेच्या, महाराष्ट्राच्यासमोर आणावी असे वाटते आहे. विनाकारण एखाद्याचा तिरस्कार तुम्ही का करता हे सांगितले पाहिजे. खरं सांगू पानवलकर, आपला कोणीतरी इतका तिरस्कार करते हे खूप वेदनादायक असते.
हेरंब कुलकर्णी (९२७०९४७९७१) 

एका अस्वस्थ शिक्षकाची डायरी - हेरंब कुलकर्णी

एका अस्वस्थ शिक्षकाची डायरी

लेखक, संपादक, शिक्षणक्षेत्रातले कार्यकर्ते म्हणून हेरंब आपणास माहीत आहेत.
‘सर्व शिक्षा अभियान’ मधे ते गेली दोन वर्ष समन्वयक म्हणून काम करत आहेत.
पण मुळात हेरंब हाडाचे शिक्षक आहेत. शिक्षक म्हणून स्वतःत होत गेलेल्या बदलांबद्दल....
बीएड.च्या अभ्यासक्रमात खरं तर शिक्षणाच्या निर्जीव व्याख्या पाठ करून कंटाळा आला. त्या सर्व व्याख्यांमध्ये परिवर्तन हा शब्द अपरिहार्यपणे असायचा. ठाकरे म्हटलं की ठोकशाही, कम्युनिस्ट म्हटलं की क्रांती, नरेंद्र मोदी म्हटले की रक्त आठवावं इतकं त्या व्याख्येशी परिवर्तन जोडलेलं असायचं.
शिक्षण म्हणजे परिवर्तन, काहीतरी बदलणं, एवढं लक्षात आलं. बाकी बी.एड. झाल्यावर माझ्यात काहीच परिवर्तन झालं नाही हेही लक्षात आलं. एका बाजूनं वर्गात गेलो आणि दुसरीकडून बाहेर आलो. फक्त ‘डिस्टींक्शन’चं प्रमाणपत्र हातात होतं. ते घेऊन शिक्षक झालो. मुलं ५वी ला वर्गात येतात आणि १०वी ला तशीच बाहेर पडताहेत. ‘परिवर्तन’ नावाची गोष्ट कुठं दिसते आहे हे लक्षातच येईना.
अर्थात बदल आमच्या तथाकथित शिस्तीच्या चौकटीत दिसायचे. उशीरा येणारी मुलं छडी मारली की चटकन शाळेत वेळेवर यायची. वर्गात बडबड करणार्या मुलांना छडी मारली की ती मुलंही गप्प बसायची. गृहपाठ न करणार्या मुलांना मारलं की ते गृहपाठ करून आणायचे. शाळा बुडवणार्या मुलांना आम्ही घरी जाऊन रागवायचो. शेजारपाजारचे लोक गोळा व्हायचे. त्याचा बापही त्याला बदडायचा. इतक्या व्यापक अपमानानंतर तो मुलगा शाळेत येऊन बसायचा. त्याची मान खाली आणि जिंकल्याचे भाव आमच्या चेहर्यावर. त्याच्यात बदल घडवल्याचं खोटं समाधान आम्हाला मिळायचं. एखादा विद्यार्थी उद्धटपणे वर्गात बोलायचा. त्याला मुख्याध्यापकांकडं नेऊन आम्ही फटकवून काढायचो. तो सर्व मुलांपुढं माफी मागायचा. आम्ही जिंकायचो. एक वचक निर्माण व्हायचा. गुंड मुलं बचावाच्या पवित्र्यात. आम्ही त्या परिवर्तनानं खूष व्हायचो. कॉपी करू न देण्यात माझी ख्याती. गुंड मुलं चाकूची धमकी द्यायचे. त्याला भीक न घालता मी कॉपी बाहेर काढायचो. वर्ग कॉपीमुक्त. त्या परिवर्तनानं मला ‘शिक्षणतज्ज्ञ’ झाल्याचं समाधान मिळायचं. दहावीतही मुलं-मुली - त्यांची प्रेमप्रकरणं चालायची. एखादी चिठ्ठी मी पकडली की पोलीस महासंचालकासारखी उलटतपासणी करायचो. बेइज्जत झाल्यानं ते दोघे किमान शाळेत तरी ‘नीट’ वागायचे. खाली माना घालायचे. त्यांच्यातली चारित्र्यनिर्मिती(!) बघून माझ्यातला ‘विवेकानंद’ सुखावायचा.
असं माझं सारं छान चाललं होतं. वयाच्या पंचविशीत शाळेतला एक कडक शिस्तीचा शिक्षक म्हणून पंचक्रोशीत ख्याती होती. झोपडपट्टीतली शाळा. त्यात सहा फुटी तगडी पोरं आणि किरकोळ देहयष्टीचा मी. त्या पोरांना नमवण्यात वेगळाच अहंकार सुखावायचा. शिस्तीनं आपण त्यांच्यात परिवर्तन घडवतो हा भ्रम निर्माण होत राहिला. अज्ञानातलं सुख आनंद देत राहिलं.
‘कॉपी’ या विषयानं माझा भ्रम तोडला. ‘कॉपी’ मागील मानसिकता ही अप्रामाणिकपणाशी जोडलेली आहे. शिक्षणातून प्रामाणिकपणा रुजावा ही जर भूमिका असेल तर कॉपीचं उच्चाटन झालं पाहिजे. त्या प्रबोधनासाठी मी मूल्यशिक्षणाचे तास वापरले. रोज त्या विषयावर माझं प्रवचन मुलं श्रद्धेनं ऐकायची. ‘आम्ही कॉपी का करतो?’ हे मुलांकडून मी लिहून घेतले. मुलांनी पालकांची भीती, प्रतिष्ठेच्या संकल्पना हे सारं सारं लिहिलं पण ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकातला आचार्य माझ्यात संचारला होता. पुन्हा त्यांना मी उपदेशच करत राहिलो. ‘कॉपी’ करणार्या मुलांचे पालक बोलावले. त्यांची बेइज्जती केली. तरीसुद्धा मुलं सुधारली नाहीत. दहावीची सराव परीक्षा आली. मुलांना म्हणालो-कॉपी करू नका. मुलं म्हणाली नाही करणार. एकाही मुलानं कॉपी केली नाही. मला बुद्ध झाल्याचा भास झाला.
पण भ्रमाचा भोपळा बोर्डाच्या परीक्षेत फुटला. सरसकट मुलांनी कॉपी केली. मी डोळ्यात पाणी आणून त्यांना विनंती केली पण व्यर्थ. निरोपसमारंभात मुलांनी मला हातातले घड्याळ भेट दिले होते. ते घड्याळ गणिताच्या पेपरला मी मुलांकडे फेकले व म्हणालो - ‘जर आजच्या पेपरला तुम्ही कॉपी केलीत तर मी हे घड्याळ स्वीकारणार नाही.’ काहीच फरक पडला नाही. मी घड्याळ घेतले नाही. ‘इमोशनल ब्लॅकमेलींग’ व्यर्थ गेले ! मुलं खाली माना घालायची. कॉपी करण्यामागची अगतिकता त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसायची. आम्ही दिलेल्या शिक्षणातून त्यांच्या संकल्पना स्पष्ट होत नव्हत्या. नापास झाले तर आईबाप मारहाण करण्यापासून शिक्षण बंद करण्यापर्यंत सर्व काही करणार. सामाजिक बेइज्जत वेगळीच. या अगतिकतेत माझं प्रबोधन, माझी प्रवचन मालिका सगळं वाहून गेलं. परिवर्तनाचे प्रयोग पुन्हा फसले.
पुढे निकाल लागला. ती सगळी पोरं पास झाली. कॉलेजात गेली. मी ज्यांना शिस्तीच्या चाबकानं फटकारलं होतं ती सारी पोरं पाण्याच्या वाफेनं झाकण उडावं तशी बेताल झाली होती. मला बघितलं की चांगला शिक्षक म्हणून आदर द्यायची पण त्यातली वाह्यात पोरं गुटखा खाऊन थुंकायची. अचकट-विचकट बोलायची. त्यांच्या नजरेतला बेधडकपणा, बेरकीपणा मला टोचायचा. अवमान वाटायचा. पण त्याहीपेक्षा जास्त परिवर्तन फसल्याचं दु:ख असायचं.
मी खूप विचार करायचो. ही मुलं का बदलली नसतील? आपली तळमळ यांच्यापर्यंत का पोहोचली नसेल? इतक्या महापुरुषांच्या कथा सांगूनही ते सगळंच का वाहून गेलं असेल? काहीच कसं झिरपलं नाही? आपण त्यांना चांगल्यासाठीच मारलं. तरीही आपल्याविषयी शत्रुत्वाची भावना का? हेतू चांगला पण अंमलबजावणी का फसली? मी विचार करत बसायचो. शब्दांच्या प्रबोधनातच मर्यादा आहेत. तेव्हा शब्दातीत माध्यमं कोणती आहेत, त्याचा मी शोध घ्यायला लागलो. जे. कृष्णमूर्तींच्या एका पुस्तकाचा शेवट एका गोष्टीनं झालाय. त्या गोष्टीनं मला अंतर्मुख केलं. ती कथा अशी-
‘एक साधू आपल्या शिष्यांना रोज सत्य, प्रेम, सौंदर्य यावर प्रवचन द्यायचा. एक दिवस तो प्रवचन सुरू करणार इतक्यात एक बुलबुल पक्षी तिथं आला. तो गाणं गाऊ लागला. एक तास गाणं गात राहिला. साधू काहीच बोलला नाही. शिष्य काहीच बोलले नाहीत. पक्षी उडून गेला साधू म्हणाला-
‘आजचे प्रवचन संपले’
या गोष्टीनं मला आतून हलवलं. तुमचा सहवास मुलांना बदलवू शकतो. शब्दातीत संवादच परिवर्तन घडवू शकेल. हे जाणवताच मी आध्यात्मिक शस्त्रभांडारात दाखल झालो.
जे. कृष्णमूर्ती, रजनीश वाचून काढले. अवतार मेहेरबाबांची नगरला समाधी आहे. ते ४४ वर्षे मौन राहिले. त्यांच्या मौनाचं मला आकर्षण वाटलं. एक दिवस सकाळी १० ते संध्याकाळी पाचपर्यंत समाधीसमोर मौन करून बघितलं. मुलांवर मौनाचे प्रयोग सुरू केले. विपश्यना शिकलो. मूल्यशिक्षणात मुलांकडून मौन करून घेतलं. रोज सगळा वर्ग शांतपणे मौन व्हायचा. मुलं घरीही मौन करायला लागली. कृष्णमूर्तींच्या पुस्तकातून निसर्गाचं महत्त्व कळालं. मुलांना मैदानावर नेऊन आकाशाचे रंग बघत मौन करायला शिकवलं. ‘सूर्यास्त कोणी बघितला?’ हा ‘गृहपाठ’. रोज विचारायला लागलो... तरीही परिवर्तन कुठं सापडेनाच. मी पुन्हा सुन्न झालो.
शिक्षणातून जो संवेदनशील, हळुवार, रसिक, जबाबदार नागरिक निर्माण करायचा आहे त्याची शक्यताच मला कुठे दिसेना. आमचे रुक्ष अभ्यासक्रम, त्याहीपेक्षा रुक्ष शैक्षणिक वातावरण, यातून हे सारं घडणार कसं हेच समजेना. जेलर आणि आरोपी असं आमचं मुलांशी नातं होतं. या नात्यात हे काहीच समजेना.
तिथून पुढं शिक्षणाचा शोध घेऊ लागलो. कृष्णमूर्तींची ‘सह्याद्री स्कूल’ बघून आलो. भर दुपारी उन्हात तो डोंगर चढलो. तिथून काही शिकता येतं का? याचा शोध घेतला. भटकत राहिलो. प्रयोगशील शाळांचेही दरवाजे ठोठावले. त्या शाळांनाही हाच प्रश्न विचारला की शाळा सोडल्यावर बाहेरचा समाज संस्कार पुसत राहतो, तर शाळेचे कोणते संस्कार टिकून राहिलेत? व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम करून गेलेत? हे विचारत राहिलो पण इतका शास्त्रशुद्ध अभ्यास अजून व्हायचाय हे लक्षात आलं.
त्याच सुमारास नरेंद्र मोदीने गुजराथमध्ये मुस्लिमांचे शिरकाण घडवले. सुशिक्षित तरुण-तरुणींचा सहभाग विलक्षण होता. सुशिक्षितपणाचा त्यांना उपयोग इतकाच झाला की मुस्लिमांची घरे शोधण्यासाठी मतदारयादीचा वापर करावा ही सुपीक कल्पना त्यांना सुचली....तेव्हा वृत्तपत्रात मी ‘साबरमतीकाठी आधुनिक शिक्षणाचं थडगं उभारा’, असं लिहिलं. शिक्षणानं हिंसा कमी होणार नसेल तर ती कशानं कमी होणार? गुजराथमधील महाभयंकर कहाण्यांनी सुन्न करून टाकलं. ‘कम्युनल कॉम्बॅट’ नं छापलेली छायाचित्रे बघितल्यावर तर त्या रात्री न जेवताच झोपलो. माणसातल्या पशूला हाताळण्यात आमचं शिक्षण कमी पडतंय. माणसातल्या जनावराला आम्ही स्पर्शही करत नाही. मानवी भावनांचं समायोजन या शिक्षणातून कसं करता येईल? याने तर मी पुरता गोंधळून गेलो. शाळेत मुलांच्या होणार्या मारामार्या. त्यांच्यातील द्वेष, ईर्षा बघून तात्कालिक शिक्षा करायचो. पण निरुत्तर व्हायचो. पुन्हा पुन्हा जे. कृष्णमूर्तींची प्रश्नोत्तरे उघडून बघायचो. कृष्णमूर्ती सांगायचे तुमच्यातील तळमळ, समोरच्याविषयीचे उत्कट प्रेम व विषय शिकवण्यातली निष्ठाच मुलांना बदलवून टाकील. रोज डायरी लिहायचो. एखाद्या मुलाला शिक्षा केली तर स्वत:लाच खूप दोष द्यायचो. नवा संकल्प करायचो. मौनाचे प्रयोग, तळमळीनं शिकवणं, मुलांना शिक्षा न करणं, प्रेमानं संवाद वाढवणं हे सारं करत राहिलो. परिवर्तनाच्या शक्यता तपासून बघत राहिलो.
समाजातल्या आजच्या दोषांना उत्तर म्हणजे शाळा असल्या पाहिजेत असं वाटायचं. कृष्णमूर्तींमुळं सामाजिक प्रश्नांची व्यक्तिगत उत्तरं शोधायची सवय लागली. आजचा भ्रष्ट समाज, हिंसक समाज, मानवी नात्यातील क्रौर्य हे बदलायचे असेल तर शिक्षणातूनच ते घडायला हवे. शिक्षणातून ती जडणघडण होणार नसेल आणि फक्त माणसांचे राहणीमान बदलणार असेल, भाषा बदलणार असेल व मानसिकता तीच राहणार असेल तर हे सगळं बदलणार कसं?
दहा वर्षे वेगवेगळे प्रयोग करूनही रोखठोक परिवर्तनाचा ‘ब्ल्यू प्रिंट’ हाताशी लागलाय असं ठामपणे म्हणता येत नाही.
मध्यंतरी एक माजी विद्यार्थी भेटला. सध्या नगरपालिकेत काम करतोय. आदरानं नमस्कार केला. भेटीचा आनंद डोळ्यात तरळत होता. गप्पा झाल्या. मी खूप चांगलं शिकवलं असं म्हणत होता. त्याला थेटपणे प्रश्न विचारला, ‘‘मी एखादी गोष्ट शिकवली आणि तुला त्याचा आज उपयोग होतो असं नेमकं काय आहे?’’
तो बराच वेळ गप्प राहिला. तो इतकंच म्हणाला, ‘‘तुम्ही खूप काहीतरी चांगलं आम्हाला शिकवत होतात. आपण कुणीतरी चांगलं बनावं एवढं वाटत राहिलं,’’ त्याला शब्द सापडत नव्हते पण एकूणच त्याने मला चांगल्या यादीत टाकले होते! माझी आठवण म्हणजे मूल्यांची आठवण असं घडत होतं. मला वाटतं परिवर्तनाचा रस्ता याच परिघातून सुरू होत असावा...
रजनीश वाचल्यानंतर नैतिक, अनैतिकतेच्या बालिश कल्पनाही मनातून कोलमडल्या. नैतिक-अनैतिक खोड्यात तुम्ही मुलांना अडकवलं की मुले ही वायफळ बडबड विसरून जातात. एखाद्या व्यसनाचा अंमल उतरावा तसा उपदेशाचा अंमल उतरतो आणि माणूस शेवटी स्वत:तील नैसर्गिक प्रेरणांना प्रतिसाद देतो. तेव्हा नैतिकता ही शिकवण्याची गोष्ट नाही हे लक्षात येत गेलं. त्याहीपेक्षा विचार करायला शिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. एकदा विचार करायला शिकवलं की मुलं आपोआप आपल्या जगण्याचा अर्थ लावू शकतात हेही लक्षात आलं. तेव्हापासून उपदेश करण्यापेक्षा मी वर्गात विचार करायला लावणारे प्रश्न विचारू लागतो.
‘स्त्री-पुरूष’ समानता शिकवताना, ‘विवाहसंस्थेत मुलाचे वय, शिक्षण, उंची मुलीपेक्षा जास्त असावी ही अट मुलीला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बाद करणारी मानसिकता आहे’ हे मी सांगायचो, त्यामागील धोरण सांगायचो. माझं लग्न ठरल्यावर एका मुलानं मला थेटपणे, ‘सर, तुमची बायको तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे का हो?’ असं विचारून तपासलं होतं. ‘जगात म्हातारपण नसते तर?’ हा निबंध लिहिताना एका मुलानं, ‘अशा प्रकारच्या दु:खांची जाणीव झाली नसती तर सिद्धार्थ कदाचित गौतम बुद्ध झाला नसता’ असं लिहिलं, तेव्हा मी शहारलो. धर्माचा उगमच ‘अपरिहार्य दु:ख आपण थांबवू शकत नाही’ यात आहे हेच जणू त्या मुलाने सांगून टाकले.
वर्गात, बाबा आमटेंनी रस्त्यातील गटारातला महारोगी उचलल्याची कथा सांगताच शासकीय रुग्णालयाबाहेर पायात वळवळणार्या अळ्या झालेला रोगी दिसताच मुलांना ‘बाबा आमटे’ आठवले आणि तात्काळ ते माझ्याकडे आले. आम्ही तो रोगी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केला. मुलांनी महिनाभर शुश्रूषा केली. माझ्यातील ‘परिवर्तनवादी’ सुखावला...
पण तरीसुद्धा हे भावनिक प्रतिसाद माणसांच्या सवयीत रूपांतरित होतात का? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. स्मशानवैराग्यासारखे हे सारे असते का? शाळेतले संस्कार जर भावनिकच राहात असतील व समाज ते पुसत असेल तर हा परिवर्तनाचा खटाटोप तरी का करावा? या प्रश्नांनी मी चक्रावून जायचो.
मुलं कुटुंबात हिंसा बघतात. समाजात भ्रष्टाचार बघतात. शाळेतली शिकवणूक त्यांच्यावर कितपत प्रभाव गाजवत असेल? शेवटी ही पुसण्याची प्रक्रियाच प्रभावी ठरत असेल तर मूळ पाटीवर अक्षरं का लिहायची? याचं उत्तर मिळत नाही.
विजय तेंडुलकरांना एकदा भेटलो. हिंसेवर खूप चर्चा केली. त्या चर्चेतून २ X २ = ४ असं उत्तरच मिळेना. मी तेंडुलकरांना इतकंच म्हणत राहिलो की वाढत्या वयात जे गुन्हेगार होतात त्याची मुळं शाळकरी वयात असतात का? मेंदूच्या रचनेत तसं काही असतं का? हिंसा ही वृत्ती असते का? मेंदूतील हिंसेची केंद्रं नष्ट करण्यासाठी आपण शाळेत कोणते उपक्रम राबवावेत? माझ्या भाबड्या प्रश्नावर तेंडुलकर हसत होते. हिंसा ही जीवनात कोणत्याही क्षणी विकसित होणारी गोष्ट आहे. तो एक अपघात असतो. सरळ अहिंसक जीवन जगणारा माणूस कुठल्याही क्षणी हिंसक होऊ शकतो. परिस्थिती हेच त्याचे उत्तर असते.
तेंडुलकर हे सारं सांगत होते. हिंसेचे मेंदूतील जंतू मारायला कोणतही ‘ऍन्टी-बायोटिक’ नाही. संपूर्ण समाजच अहिंसक व्हायला हवा असे माझ्या लक्षात आले. माझी शोधयात्रा सुरूच राहिली. शिक्षणावरचं वाचन वाढलं. आपण किती मुलांशी क्रूर वागलो यानं मन भरून यायचं. त्यातच तोत्तोचान वाचलं. बॅन्डवाल्यांशी बोलणारी मुलगी बेशिस्त म्हणणारा शिक्षक आपणच आहोत असं वाटायला लागलं. त्याच पुस्तकात असं लिहिलंय - ‘तोत्तोचानसारख्या शाळा जगात सर्वत्र असत्या तर जगात युद्धंच झाली नसती.’ हे वाक्य वाचल्यावर - शिक्षणात हिंसा संपवण्याच्या शक्यता आहेत, तेव्हा प्रयोगशील शाळा निर्माण करणं, प्रेम झिरपणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं.
रेणू गावस्करांचे रिमांड होममधले अनुभव वाचताना प्रेम ही एक थेरपी म्हणून कसं काम करते हे लक्षात आलं. लीलाताईंच्या पुस्तकांमधून मुलांना चौकस बनवणं कसं महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं. त्यातूनच विचार करायला कसं शिकवता येईल ते लक्षात आले.
शेवटी शिक्षकाचं व्यक्तिमत्त्वच मुलांमध्ये संक्रमित होतं हेच खरं. ग्रीक साहित्यातील ऐकलेली 'The Picture of Dorian Gray' ही कथा नेहमीच मला खुणावते. निरागस चेहर्याचा राजपुत्र. त्याचं एक पोटर्रेट त्याच्या बेडरूममध्ये ठेवलेले. त्याने पाप केले की त्याचा डाग त्या पोटर्रेटवर उमटणार. व्यक्तिमत्त्व मात्र निरागसच राहणार. राजपुत्र पापं करत राहतो. पोटर्रेट डागाळत राहते. शेवटी राजपुत्राकडून खून होतो आणि पोटर्रेट रक्ताळते. राजपुत्राची निरागसता कायम राहते.
मला वाटतं शिक्षकाचं व्यक्तिमत्त्व मुलांमध्ये अशाप्रकारे परावर्तित होत असते. आपल्या गुण-दोषाचं प्रतिबिंब मुलांमध्ये पडते आणि मुलं त्याप्रमाणे घडत-बिघडत राहतात. हीच परिवर्तनाची दिशा आहे. तेव्हा शिक्षकानं स्वत:चं व्यक्तिमत्त्व अधिक संवेदनशील, हळुवार, प्रेमपूर्ण करणं हेच परिवर्तनाची शक्यता सूचित करणारं आहे इथपर्यंत येऊन मी थांबलो.
जे. कृष्णमूर्तींना एका मुलानं विचारलेल्या प्रश्नानं मला खूप काही शिकवलं. तो मुलगा कृष्णमूर्तींना विचारतो की आम्हाला खेळात जितका आनंद मिळतो तितका आनंद अभ्यासात का मिळत नाही?
कृष्णमूर्ती उत्तर देतात की तुमच्या शिक्षकांना आनंद मिळत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. एखादा गायक शेकडो तासांच्या रियाजानंतर बैठकीवर बसतो तेव्हा त्यानं म्हटलेलं गाणं लोक कित्येक दिवस गुणगुणतात. तशा तयारीनं आणि विषयावरील प्रेमानं तुमचे शिक्षक वर्गात प्रवेश करतील तेव्हा खेळण्याइतकाच आनंद तुम्हाला अभ्यासातही मिळेल...’
कृष्णमूर्तींच्या या उत्तरानं परिवर्तनाचा रस्ता दाखवला. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या चेतनेला स्पर्श करता आला पाहिजे हेही लक्षात आलं.
हे सारं डोक्यात घोळताना प्राथमिक शिक्षणाकडं वळलो. आदिवासी भागातील २०० पेक्षा जास्त गावं बघितली. ४०० पेक्षा जास्त शाळा बघितल्या. माझ्यातील शिक्षकाचा झालेला संघर्ष मला कुठेच दिसेना. पाण्यात तेल सांडल्यावर तेलाचा जसा तवंग पाण्यावर पसरतो तसा एक प्रकारचा कंटाळा शाळेवर पसरला आहे असं जाणवू लागलं. शिक्षकाचं व्यक्तिमत्त्वच कोरडंठाक आहे. त्याच्यात उत्स्फूर्तताच नाही. तो गाणी म्हणत नाही, मुलांना स्पर्श करत नाही. मुलांशी बोलत नाही. तो फक्त उभा आहे किंवा वर्गात रेंगाळतो आहे. हे बघितल्यावर मन सुन्न झालं. मुलं लिहू-वाचू शकत नाहीत यावर मी भाष्य केलेच आहे. त्यावर इतरत्र सविस्तर लिहिले आहे. पण शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वातच समृद्धी नसल्यानं वर्गात काहीच घडत नाही. मुलं वर्गात येतात, बसतात, उठून जातात एवढंच घडतंय. शिक्षकानं शिकवलं तरी त्या शिकवण्यात जान नाही. त्यानं भावनिक कविता शिकवली तरी मुलं रडत नाहीत आणि विनोद केला तरी मुलं हसत नाहीत... गुणवत्तेच्या प्रश्नापेक्षाही हे मला जास्त अस्वस्थ करणारे वाटले. शिक्षकातच काही परिवर्तन नाही तर मुलांमध्ये झिरपणारं कसं...? शिक्षकालाच समृद्ध आणि संवेदनशील कसं बनवायचं हाच खरा प्रश्न आहे !
अखेरचा प्रश्न-शिक्षणानं व्यक्तित्वात, जाणिवेच्या पातळीवर परिवर्तन करावं ही अपेक्षा व्यक्त केली, तरी फोल ठरते आहे. पण किमान सामाजिक, आर्थिक परिवर्तन ग्रामीण समाजांमध्ये निर्माण केले आहे का? या परिवर्तनाची चर्चा करावीच लागेल.
ग्रामीण भागातील बदलाला शिक्षणानं हातभार लावला आहे हे खरं. पण आदिवासी भागात असं विधान करणं धाडसाचं ठरेल. जीवनसंघर्ष इतका तीव्र आहे की शिक्षण हा आदिवासींचा शेवटचा प्राधान्यक्रम ठरतो. पण जी मुलं शाळेत येतात त्यांच्यात काही बदललं आहे का? तर याचं उत्तर नकारार्थी आहे. खूप थोडे शिकले, शहरात गेले, नोकर्या मिळाल्या. त्यांचा जीवनस्तर बदलला हे मान्य पण आदिवासींच्या भारतातील गळतीपेक्षा महाराष्ट्रातील गळतीचे प्रमाण जास्त, हे कसे समजावून घ्यायचे? झाडावरून टपाटपा पानं गळावीत तशी लेकरं शाळेबाहेर पडत आहेत. शाळाच मुलांना आकर्षित करत नाही. पकडून ठेवू शकत नाही. जगण्यातलं परिवर्तन तर खूप लांबची गोष्ट राहिली.
शिक्षणानं माणसांचे सामाजिक, आर्थिक वर्ग बदलले पाहिजेत पण आदिवासी भागात हे अपवादानेच घडते. दहावीपर्यंत पोरगा टिकतच नाही. पन्नास वर्षांपासून ज्या गावात शाळा आहे त्या गावात आजही बारावी पास पोरगा सापडत नाही. गावातील महिला किती शिकली हा प्रश्न विचारण्याची हिंमतच होत नाही.
इतकं हे सारं विदारक आहे. दहावीतला पोरगाही स्वत:चं नाव नीट लिहू शकत नाही. परिवर्तनाची गोष्टच दूर राहिली.
२०२० साली भारत महासत्ता होणार आहे. २०२० साली आज चौथीत शिकणारा पोरगा २५ वर्षांचा तरुण असेल. गडचिरोलीतला पोरगा तेंदूपत्ता गोळा करत असेल, मेळघाटातला तरुण पाखरं मारत असेल, कोकणातला तरुण मासे मारत असेल, मराठवाड्यातला तरुण रोजगार हमीवर, पश्चिम महाराष्ट्रातला तरुण दुधाची बरणी घेऊन आणि विदर्भातला तरुण शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असेल...
इतकी भयावह स्थिती आहे. माणसांचा कोणताच स्तर बदलत नाही. त्यामुळे शिक्षणावरची श्रद्धा डळमळीत होते आहे. ‘शिक्षण नोकरीसाठी नाही’ हे सांगितलं तरी भाकरीचा प्रश्न सुटत नसेल तर शिकायचं कशाला? या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही.
भ टक्या विमुक्तांच्या आश्रमशाळेत पाच जागा राखून ठेवल्या आणि भटक्यांच्या वस्तीत पोरं आश्रमशाळेत घाला असं म्हणायला गेलो. एक कैकाडी म्हणाला, ‘‘तुमच्यासारख्याच एका शहाण्याचं ऐकून पोरगं शाळेत टाकलं आणि आम्ही टोपल्या विकत गावोगावी फिरलो. आज ते पोरगं बारावी नापास झालं. ते आता तुमच्याकडूनही हुकलं आणि टोपल्याही विणू शकत नाही’’ माणसांची शिक्षणातून आर्थिक परिवर्तनाची भूक आपण कशी पुरवणार?
शिक्षणातून रोजगार नाही. सामाजिक प्रतिष्ठाही पूर्वीसारखी मिळत नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षण नाही. त्यामुळं मुलं शाळेत टिकत नाहीत. खेड्यापाड्यापर्यंत फक्त शिक्षण नेल्याचं फसवं समाधान आम्हाला मिळालं. काहीच बदललं नाही.
जीवनसंघर्ष तोच राहिला -
फूल कहते है चमन बदला है
पंछी कहता है आकाश बदला है
लेकीन मुर्दे वही है
सिर्फ कफन बदला है...
परिवर्तन झालं ते फक्त इतकंच.

पालकांसाठी लेख - (हेरंब कुलकर्णी )

पालकांसाठी लेख (हेरंब कुलकर्णी )
टिव्ही आणि सोशल मिडिया यांचा लहान मुलांवर होणारा परिणाम व पालकांची जबाबदारी यावर आज सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत लेख प्रसिद्ध झाला आहे.......................
हजार तासांची घरातली शाळा..... ___________________________
शिक्षण कायदयाने प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास तर माध्यमिक शाळा १००० तास चालते. इतका कमी काळ चालणार्या शाळेचे आपण समाज शासन पालक म्हणून किती बारकाईने मूल्यमापन करतो. त्यांच्याकडून खूप सार्या अपेक्षा करतो.ते करायला ही हरकत नाही.पण दुसरी एक १००० तास घरातच शाळा भरते पण त्या शाळेकडे पालक लक्ष देत नाही की त्या शाळेशी दर्जा सुधारा म्हणून भांडत नाहीत. त्या शाळेकडून अपेक्षा करीत नाहीत. कोणती आहे ती शाळा ?ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मिडियाची....!!!!
१००० तास ? होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे काळजीने बघत नाहीत.
याउलट टिव्हीविरोधी बोलणार्यााना फॅडिस्ट समजले जाते.माझ्या घरातला टिव्ही गेली ३ वर्षे मी बंद ठेवला आहे. त्याचा लाभ मुलाचे वाचन,चित्र काढणे वाढले.गंभीरपणे एखादा विषय समजून घेणे वाढले. माझे स्वत:चे लेखन टिव्ही नसल्याने वाढले.मुलगा ज्या विषयात आवड आहे ती माहिती नेटवर बसतो. बातम्या दुसर्या दिवशी वर्तमानपत्रातून समजल्याने काही फरक पडत नाही. हे सारे सकारात्मक परिमाण मी अनुभवतो आहे॰ पण जेव्हा आमच्याकडे कुणी येते आणि घरात टिव्ही नाही तेव्हा एखाद्या हातपाय नसलेल्या व्यक्तीकडे दयेने बघावे तसे ते बघतात व जगाच्या ज्ञांनापासून मुलांना दूर ठेवू नका असा उपदेश करतात.
तेव्हा या टिव्ही आणि सोशल मिडियच्या अनौपचारिक शाळा खरच जगाचे परिपूर्ण ज्ञान देते का ?मुलांना शाळा जशा विकासाच्या संधी देते तशा संधी देते का ?या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी.
टिव्ही ने आणि सोशल मीडिया ने शारीरिक नुकसान मुलांचे होते त्यापेक्षा कितीतरी जे अधिक नुकसान हे मानसिक स्तरावरचे असते. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्याने मुलांना मग हिंसकताही आवडू लागते. कार्टून सिरियल्स बघितल्यामुळे लहान मुलांमध्ये हिंसकता वाढते. टॉम व जेरीचे विनोद हे आवडतात. त्यांच्यातली हिंसक प्रवृत्ती व त्यांच्या हिंसक कारवायांभोवती गुंफलेले असतात. हॉरर चित्रपट किंवा मालिकासुद्धा आवडायला लागतात. भीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकटय़ाने किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही बघायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात . म्युझिक व्हिडीओज्, हॉरर मूव्हीज् आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओज् बघायला आवडतात. मध्यंतरी मानसोपचार परिषदेत किशोर अवस्थेतील ५० टक्के मुले पोर्न बघतात असा निष्कर्ष अतिरेकी वाटला तरी मोबाइलच्या वापरामुळे वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.
आपली मुले टिव्ही आणि सोशल मिडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची तोडफोड होते.हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात.अपघात बघून थंडपणे पुढे जाणारी पिढी घडते.ओरडणे,शिवीगाळ,प्रसंगी मारहाण हे स्वभाव विशेष होतात. मध्यंतरी संगमनेर तालुक्यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलके उदाहरण ठरावे. प्रेमप्रकरणे अगदी ५ वीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या ३ वर्षात मुंबईत १५ वर्षाखालील मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात १४४ टक्क्याने वाढ झाली आहे तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशीलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही ?
ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळे तिथे मुले जास्त टिव्ही बघतात. मोबाइल बघतात.या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतील जग त्यातील घर,तिथली सुंदर नटलेली आई ,गाडी आपल्या वाट्याला का नाही ? यातून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये
संशोधनात असे आढळून आले की, जास्त टीव्ही पाहणार्याल मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांबउडीदेखील मारू शकत नाहीत. माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त संशोधनातून मुलांनी अनेक तास टीव्ही पाहिल्याने त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात. त्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळे भविष्यात त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका पोहोचू शकतो.
तासन्तास दूरचित्रवाणी बघितल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्यता असते.पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेणार्याम रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होते
यावर उपाय काय? आमच्यासारखे टिव्ही बंद करावा आणि ते शक्य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज १ तास टिव्ही बघण्याचे वेळापत्रक ठरवावे. कार्यक्रम एकत्र बघावेत.बघितल्यावर मुलांशी त्यावर चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव,खोटी जीवनमूल्ये यावर चर्चा करून वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर आपण सोशल मिडिया कमीत कमी वापरुन मुलांच्या हातात मोबाइल देवू नये. उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणे,खेळणे .त्याला चित्र काढणे,गोष्टीची पुस्तके वाचणे हे करायला हवे.पालकांची मुले अनुकरण करतात. तुमच्या हातात पुस्तके आली,घरात लहान मुलांसाठी ची पुस्तके असली तरच मुले ती वाचतील. तेव्हा पालक टिव्हीसमोर आणि whatsapp वर असतील तर मुले तेच करणार..तेव्हा टिव्ही सोशल मिडियाला सशक्त पर्याय पालकांनी दिले तरच घरातली १००० तासांची शाळा मुलांची सुटेल.
राजीव दीक्षित म्हणायचे की राजा हरिश्चंद्र हे नाटक बघून जर मोहनदास नावाचा बालक सत्य जगण्याचा संकल्प करून महात्मा गांधी होत असेल आणि या माध्यमात इतके सामर्थ्य असेल तर इतकी हिंसा,सेक्स आणि उथळ कार्यक्रम बघून आपली मुले काय होतील ? याची कल्पनाच करवत नाही

टीव्ही बंद अभियान
जळगाव येथील कुतूहल फाउंडेशन चे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरण करण्याचे काम गेली १० वर्षापासून करीत आहेत. या समस्येबद्दल आतापर्यंत महाराष्ट्रात ३ लाख माहिती पत्रकांचे वाटप केले.४०,००० हून अधिक मुलांचे सामुहिक समुपदेशन झाले आहे.शेकडो व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा , पालक सभा , शिक्षक सभा, अशा विविध माध्यमातून या विषयावर नियमित प्रबोधन करीत आहेत. टीव्ही बंद नव्हे तर टीव्ही शिस्त अभियान ते सांगतात. टीव्ही,मोबाईल,इंटरनेट, व्हाटसअप फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा असे सांगणारे ‘या टीव्हीच काय करायचं?’ हे पुस्तक लिहिले.त्याला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. टीव्ही शिस्त पुरस्कार विद्यार्थी, पालक यांना वितरीत करतात टीव्ही,मोबाईल, इंटरनेट व सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्यांसाठी टीव्ही ,मोबाईल,इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रही सुरू केले. केवळ टीव्ही ला विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू करण्यात आले.त्यात विज्ञान प्रकल्प,बौद्धिक खेळणी,सीडी,पुस्तके,सहली,यासह उपक्रम केंद्र सुरू केले आहे. हजारो विद्यार्थी व पालक या वर्गात सहभागी झाले. यातून पालकांना पर्याय मिळाला. आठवड्यातून एक दिवस टीव्ही बंद. टीव्ही किती वेळ बघायचा याचे वेळापत्रक मुले टीव्ही शेजारी लावतात.
महेश गोरडे फोन नंबर ९४२०७८७१७३
२० सोनेरी वर्ष
महेश गोरडे सांगतात की रोज सरासरी ४ तास टीव्ही ,व्हाटस अप ,फेसबुक चा वापर याप्रमाणे एका वर्षाला १४६० तास ,तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७६०० तास टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक साठी खर्च होतो . १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यतील २० सोनेरी वर्ष टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक वर अक्षरश: वाया घालवतो.
भारतातील मुले (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटे (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात. शनिवार-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटे (सुमारे साडेतीन तास).
वय वर्षे चार ते नऊ या वयोगटातील मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटे आहे.
संपूर्ण देशभरातील तीन कोटींहून अधिक मुले (चार ते १४ वर्षे) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात.
रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिन्दास चॅनलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुले आहेत.
‘आहट’ या हॉरर मालिकेचे ४८ टक्के प्रेक्षक हे चार ते १४ वयोगटातील मुलं आहेत.
स्टार वनवरील ‘हॉरर नाईट्स’ या मालिकेचे हिंदी भाषिक राज्यांतील ४८ टक्के प्रेक्षक १४ वर्षांखालील मुलं आहेत, तर २५ टक्के प्रेक्षक हे नऊ वर्षांखालील मुलं आहेत.
( ‘व्हॉट्स ऑन इंडिया’ने मे २०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षण)
(महेश गोरडे 9420787173)
----------------------------------------- लेखन /// हेरंब कुलकर्णी फोन ९२७०९४७९७१
ईमेल herambkulkarni1971@gmail.com 

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...