स्वतःचा फायदा असला तरी खोटं बोलणं मी टाळतो. टिळक लोकमान्य होते. त्यांच्या संदर्भात खोटं बोलायची मला गरजच नाहि. मी फक्त एक कोॅमेंट केली की- प्लेगच्या निवारणाबाबतीत टिळक काहीसे दैववादी होते. प्लेग निवारणाकरता तेंव्हाच्या पुण्यातिल सनातन्यांनी गोर्या सोजिरांना हवे तसे सहकार्य केले नाही.
यात मी टिळकांचा अपमान केला का? या साध्या वाक्याचे संदर्भ मागण्याकरता सनातन्यांनी काल मध्यरात्रीपासून झक्कू लावला. मी संदर्भग्रंथ ऊशाशी घेऊन झोपत नाही. तसेच फेसबुकवर जरी असलो तरी बहुतेक वेळा ट्रेन मधे असतो. असो. ही घ्या खुद्द टिळकांच्याच अग्रलेखांमधील काही वाक्यं. लिंक द्या, संदर्भ द्या, अमुक द्या, तमुक द्या असा हट्ट धरू नये.
पुण्यात प्लेग ची साथ थैमान घालत होती . हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. रोज ही संख्या वाढत होती. प्लेगची साथ ज्या पिसवा मुळे पसरत होती त्यावर नियंत्रण करण्यासाठी जे बाधित आहेत त्यांना औषध उपचार करण्याची आणि घर घरात औषध फवारणी करण्याची गरज होती. परंतु पुण्यातील सनातनी ब्राम्हण सरकारच्या तपासणी आणि फवारणीला विरोध करत होते. आमच्या घरात आणि देवघरात इंग्रज मुद्दाम महार शिपायांना ( महार रेजिमेंट ) घुसवत आहेत आणि आमची घरे भ्रष्ट करीत आहेत आसा कांगावा पुण्यातल्या ब्राम्हणांनी सुरु केला. बाळ गंगाधर टिळक यांनी या आगीत आपल्या भडक आणि चिथावणीखोर अग्रलेखांनी आणखीनच तेल ओतले. " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? " हा अग्रलेख टिळकांनी राष्ट्रवादी भूमिकेतून लिहिलेला नाही. प्लेगचा उंदिर परवडला, पण महार सोल्जर नको, अशी अत्यंत जातीय भूमिका ब्राह्मणांनी घेतली. या ब्राह्मणांचे नेतृत्व त्याकाळी टिळकांनी आणि त्यांच्या केसरीने केले. केसरीमधून रँडविरोधात ज्वल:जहाल अग्रलेख येऊ लागले. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' हा त्यातलाच एक अग्रलेख होय. या अग्रलेखाचा हा काळा इतिहास दडवून ठेवला जातो. कारण त्यातून ब्राह्मणांचे अडाणीपण आणि जातीयवाद उघड होतो. प्लेग निवारणासाठी झटणा-या रँडच्या विरोधात टिळकांनी इतके वातावरण तापविले की, शेवटी त्यात रँडचा बळी गेला. रँड आणि त्याच्या प्लेगला आळा घालण्या साठीच्या उपाय योजना विरुद्ध टिळकांनी विरोधी बातम्या आणि अग्रलेखांची मोहीमच उघडली होती त्या पैकी हें काही नमुने पहा
प्लेगचे उंदीर बायकांच्या लुगडी-चोळ्यात आहेत काय ? रँड साहेब आणि त्याच्या सरकारने प्लेगच्या उंदरांची एवढी धास्ती घेतली आहे की ते शोधण्यासाठी रँड साहेबाचे आवडते महारसोल्जर आमच्या लेकी बाळींची लुगडी फेडून बघत आहेत. चोळ्या काढायला लाऊन बगलेत गाठ आहे किंवा काय हें चाचपत आहेत. कुणाला ताप असेल तर लगेच त्यांना पालथे निजवून नितंब उघडे करून त्यावर सुया टोचत आहेत. जी आमची ग्रहलक्ष्मी आपल्या पतीच्या शेजेवर देखील शरीरलज्जा संभाळते तिचे असे रस्तोरस्ती होणारे जाहीर वस्रहरण पाहून कुणातरी भीमाचे बाहू स्फुरण पावणार आहेत की नाही ? कुणी तरी या रँड रुपी दुशासानाची छाती फोडून त्या रक्ताने या विटंबित द्रोपादींच्या अवहेलनेचा सूड घेणार आहे की नाही ? इथे एक तरी नर अर्जुन आहे काय ? की सर्व शिखंडी आहेत असे आम्ही समजायचे ?
उंदरा बरोबर गणेशावरही फवारणी रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहचला आहे , रँडसाहेबाचे लाडके महार सोल्जर पायातल्या खेटरा सगट फवारणीचे धोटे घेवून आमच्या घरात घुसतात. घरातले समान रस्त्यावर फेकून देतात हें कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरा बरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्या पर्यंत यांची मजल गेली आहे
वरील अग्रलेख कुणी सुज्ञ आणि विचारी माणसाने लिहिला असेल असे वाटते काय ? प्लेग सारख्या भयानक साथीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारच्या उपाय योजना आणि प्रयत्नांना सहकार्य म्हणून लोकजागृती करण्याचे काम करण्या ऐवजी टिळकांनी आपल्या लेखणी आणि वृत्तपत्राचा वापर लोकात गैरसमज पसरवन्यासाठी केला यातूनच पुढे चाफेकर बंधूनी रँडची हत्या केली. तापलेल्या वाळूवर ज्या प्रमाणे लाह्या भाजून घेतल्या जातात त्या प्रमाणे तापलेल्या वातावरणात आपला मतलब साध्य करण्यात टिळकांचा हातखंडा होता.
*✒ अरविंद विनायक परांजपे*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1652405534783492&id=100000421856262
No comments:
Post a Comment