*डाँ. वा़नलेस ...हे दांपत्य मिरजेजवळ दवाखाना चालवत होते. महारोगी , क्षयरोगी यांच्या करता स्वतंत्र वसाहत निर्माण करुन नवीन डाँक्टर निर्माण करण्यासाठी मेडीकल स्कूलसुध्दा स्थापन केले. यामध्ये प्रवेश फक्त हिंदी विद्यार्थ्यांनाच द्यावा कारण कधीतरी हिंदूस्थान स्वतंत्र होईल तेव्हा परकीय लोकांच्या आयातीतून आरोग्याची हाताळणी करणेपेक्ष एतद्देशीयच जास्त उपयोग होईल असे वाँनलेस यांचे स्पष्ट मत होते. केवढा दुरदृष्टीचा माणूस... झालं काय की वाँनलेस यांची पत्नी काँलरा होऊन मृत्यू पडली. आपण एवढे निष्णत डाँक्टर असूनही आपल्या पत्नीला वाचवू शकलो नाही अशी खंत वाँनलेस यांना टोचू लागली. ते स्वतःच आजारी पडले. वाँनलेस हे अमेरिकन मिशानशी संबंधित असल्याने मिशनने त्यांच्या मदतीला नर्स म्हणून लिलियन हेवन्स यांना पाठवले. त्या विधवा होत्या व आपले सारे जीवन रोग्यांच्या शुश्रुषेकरता घालवायचे असा निश्चय त्यांनी केला होता. डाँ. वाँनलेस यांच्या बरोबर काम करताना हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. एकमेकांना आधार वाटू लागले. दोघेही लग्नाला तयार झाले. परंतु अमेरिकन मिशनचा या लग्नाला विरोध होता. ही बातमी शाहूराजाला समजली. एके दिवशी कोल्हापूर संस्थानचा शृंगारलेला रथ मिरज मिशन हाँस्पीटल येथे उभा राहिला. स्वतः शाहूराजा रथ हाकत होते. महाराजांनी निरोप देऊन वाँनलेस व लिलियन यांना रथात बसवले. रथ थेट पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावाबाहेरील चर्चच्या समोर येऊन उभा राहिला. कोडोली मिशनचे प्रमुख डाँ. ग्रँहँम यांनी महाराजांच्या सूचनेने सगळी तयारी केली होती. लग्न झाले. महाराजांनी नवदांपत्याला आहेर करून कोल्हापूरला नवीन राजवाड्यावर एक दिवस आदरातिथ्य केले. दुसरे दिवशी पुन्हा स्वतःच रथ हाकत नवदांपत्याला मिरजेला घेऊन गेले. ...ही गोष्ट काय दर्शविते ?? माणसाच्या गुणांची नुसती पारख करून चालत नाही तर त्या माणसाच्या मनात डोकावून व त्याच्या भावना ओळखून त्याला मदतीचा हात पुढे करायचा असतो तो योग्य वेळी. राजा असल्याचे कसलाच बडेजाव न बाळगणारा शाहूराजा म्हणून तर स्वतः रथाचा सारथी बनला. एखाद्या बुद्धीवंत माणसाची गुणग्राहकता ओळखून त्याला आपल्या राज्यातील प्रजेच्या हिताकरता कसे प्रेमाच्या व स्नेहाच्या धाग्याने बांधून ठेवावे याचे हे उत्तम उदाहरण आहे.*
आजकालचे,आमचे राज्यकर्ते हा धडा गिरवतील का ?? प्रत्यक्षात अमेरिकन मिशनला आपल्या अंगावर घेणारा शाहूराजा हा एकमेवच असतो. आजकालचे राज्यकर्ते स्वतःच्या हिताला प्रथम जपतत म्हणून तर सामान्य माणूस चांगल्या चांगल्या लोकसेवेपासून वंचित राहतो. बुध्दीवंताना जवळ करून लोकहीत साधा हाच तर शाहूचरित्र संदेश आहे...
राज्यकर्ते लोक अर्थात लोकप्रतिनिधी म्हणवणारे लोकांच्या वर्तनाकडे सामान्य माणसाचे बारीक लक्ष असते. राज्यकर्ते कसे वागतात , कसे जगतात हे पाहत पाहत त्याचे अनुकरण करणारा मोठा वर्ग समाजात कायमचा असतो. कुणी त्याच्या डौलदारपणाचा कित्ता गिरवू पाहतो तर कुणी त्याच्या दुसऱ्या एखाद्या वर्तणुकीचा. म्हणून या वर्गाची ही फार मोठी जबाबदारी असते की ...स्वतः विधायक व योग्य वर्तन करून लोकांसमोर आदर्श ठेवावा. शाहूचरित्र वाचताना अशा आदर्शाचा डोंगर उभा राहील. त्यापैकी हे एक महत्त्वाचे उदाहरण ...
*शाहूराजा ...जेव्हा परदेशवारी करायला निघाले तेव्हा बरीच उलटसुलट चर्चा सुरु झाली . अनेक लोक अनेक चर्चा करु लागले. अशातच एकदा सोवळं , पंचपात्र , चंदनाचा गंध , यज्ञोपवीत , उपरणे , शेंडी असा पेहराव घालून आशिर्वाद द्यायला भट वर्गलोक आले. महाराज स्पष्ट बोलले " अहो , तुमचा आशिर्वाद घेऊन माझे आजोबा परदेशी गेले होते ना ?? काय झालं त्यांचे ?? मला तुमच्या आशिर्वादाची अजिबात गरज नाही ". भटलोक परतले. शाहूराजा परदेशी प्रवासाला गेले. अनेक तीर्थस्थान व ऐतिहासिक स्थळे पाहत , कुठेही कसलेही धार्मिक विधी न करता शाहूराजे आनंदाने परतले. शहूराजे सुखरूप परतलेले पाहून पुन्हा भटलोक भेटायला आले. " तुम्ही परदेशगमन केल्याने विटाळले आहात , तुम्हाला शुद्ध करून घेणे हा आमचा धर्म आहे " असे बोलले. महाराज ताडकन उत्तरले " असल्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही " भटलोक परतले....ही गोष्ट काय दाखवते ?? धर्माचे ठेकेदार म्हणून मिरवणारे लोक राज्यकर्ते वर्गाला आपल्या कर्मकांडरुपी शस्त्राची भीती दाखवून आपला वचक ठेवू पाहतात. अंधश्रध्द राज्यकर्ते याला हमखास बळी पडतात. पण शाहूराजा अंधश्रध्द नव्हते. या कर्मकांडानी समाज रसातळाला जातो आणि यामागची सामाजिक व आर्थिक कारणे ठाऊक असणारा शाहूराजा होता. म्हणून तर त्याच्या समोर भटवर्गाची डाळं शिजली नाही.*
आजकालचे आमचे लोकप्रतिनिधी मात्र या भटीस्वार्थाला बळी पडतात. स्वतः अंधश्रध्द असतातच पण आपल्या उदाहरणाने समस्त समाजालाही उलट्या पावलांचा प्रवास शिकवतात. परिणाम म्हणून कर्मकांडाचे स्तोम माजते आणि सच्चे श्रम दुर्लक्क्षीत राहतात. ते होऊ द्यायचे नसेल तर शाहूचरित्र हाताशी धरा. पोकळ कर्मकांडाना अव्हेरा , जुमानू नका हेच तर शाहूचरित्र शिकवते..
*!! करावे साधार वर्तन , ठेवावे आदर्शाचे भान..!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १३ )*
शाहूराजा हा खरंच कोणत्या रसायनाने बनलाहोता कुणास ठाऊक ? खरे तर नुसता जन्म घ्यायचा म्हणून सरदार घराण्यात जन्मले परंतु कोणताही प्रचलित व्यवहार सरंजामी पध्दतीचा त्यांनी राखला नाही. गोरगरीब लोकांच्यात त्यांच्या पैकीच एक होऊन वावरण्यात कोण आनंद वाटायचा शाहूराजाला. आपली प्रजा जशी जगते तसेच आपण जगायला हवे या अत्यंत मानवतावादी विचारापर्यत शाहूराजाची विचारांची व आचाराची झेप होती हे पाहिले की नम्रपणे हात जोडले जातात. राजा म्हणवणारा हा " माणूस " घोड्याच्या पागशाळेत झोपला , महार - मांगाच्या गाठोड्यातील भाकरी हक्काने खाल्ली , गादीऐवजी घोंगाड्यावर डोके टेकून निवांत जगला. एक ना अनेक उदाहरणे देता येतील.
*एक वैशिष्ट्यपूर्ण आठवण ....१९२० साली नागपूर येथील एक परिषद करुन महाराज कोल्हापूरला परतणार होते. बन्ने नावाच्या आपल्या पी. ए. ला महाराज बोलले की " माझेही तिकीट तिसऱ्या वर्गाचे काढा. अहो , म. गांधी सारखे थोर देशभक्त व स्वातंत्र्य चळवळीचे पुढारी तिसऱ्या वर्गाने प्रवास करतात तर मग माझी एवढी बडदास्त कशाला ??" ...विशेष म्हणजे १८९५ साली महाराजांच्या प्रवासासाठी खास रेल्वे बोगी तयार केली गेली होती. त्या बोगीला " सलून " असे नाव होते. रैल्वे प्रवासावेळी बोगी रेल्वेस जोडत. पलंग, गाद्या - गिरद्या , कुशन खुर्ची , सोफा , स्वच्छतागृह अशा अद्ययावत सोयीने युक्त अशी " सलून " होती. पण आश्चर्य म्हणजे महाराज सलूनमध्ये न बसता इतर डब्यात बसत. सलूनमध्ये,शाही परिवारातील स्त्रीया बसत.,....हे उदाहरण आपल्या पुढे कोणता आदर्श उभा करते ?? राजा मग तो कुणीही असो , जोवर तो जनतेत थेटपणै मिसळत नाही , त्यांच्या सारखे जीवन जगत नाही , त्यांच्या संकटाना आपले संकट समजत नाही , सर्वात महत्त्वाचे म्हणजे ' जरी मी राजा असलो तरी तो मान मिळालाय तो य दिनदुबळ्या व गोरगरीब रयतेच्या प्रेमावर आणि विश्वासावर ही भावना जपत नाही तोवर...तोवर तो राजा हा " लोकराजा अथवा रयतेचा राजा " ठरत नाही. लोक अर्थात समाज नेहमीच कृतज्ञ असतात ते अशा जगावेगळ्या राजांच्या बाबतीत. असा जगावेगळा राजा म्हणजे शाहूराजा.*
आमचे राज्यकर्ते यापासून योग्य तै बोध घेतील तो सुदिन. नेहमी आपल्या आलिशान बंगल्यात व पाँश गाडीत फिरून बडेजाव करणारे लाखो लोकप्रतिनिधी आम जनता रोज पाहते. पण त्यांच्या प्रती कोणताही कळवळा अथवा ममत्व जनतेला नसते. कारण मूळात ते कधीच " जनतेचे प्रतिनिधी " नसतात. ते असतात आधुनिक सरंजामदार. अशांना जनतेच्या हृदयात कधीच थारा मिळत नाही ...हेच तर शाहूचरित्र दर्शविते.
*!! जनतेत मिसळून ...जनतेचे आयुष्य जगा...तरच स्थान हृदयात !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १४ )*
शाहू महाराज हे फार चलाख होते. आपल्या संस्थानात चालू असलेल्या हरएक बाबी बाबतीत त्यांचे काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. असंख्य उदाहरणे दिसून येतात त्यांच्या चरीत्रात. काही गोष्टी म्हटल्या तर अत्यंत मजेदार आहेत. तसेच त्या गोष्टी म्हणजे शाहूराजाच्या बद्दल एक वेगळाच आदर उत्पन्न करणाऱ्या आहेत. काही प्रामाणिक मतभेद उभे करूनही ....हे अस्सच करायला हवं अस आपले एक मन म्हणत असतेच. अशीच एक गोष्ट ...
*लाचखोरी....ही संपूर्ण शासनव्यवस्था बदनाम करत असते. लाचखोरी हा भ्रष्टाचारच असतो. तो करणारा गब्बर व निबर झालेला असतो. अशी माणसे आपण भ्रष्टाचार केलाय हे कधीच कबुल करत नाहीत. परिणाम असा होतो की , जनतेचा पैसा नाहक बरबाद करतो. असाच एक अधिकारी कोल्हापूर संस्थानात " लाचखोर अधिकारी " म्हणून प्रसिद्ध होता. एकदा सकाळी महाराजांनी त्याला राजवाड्यावर बोलावले. थेट दिवाणखान्यात नेऊन त्याला समोरच्या खुर्चीवर बसवले. महाराज बसले होते त्यांच्या हाताजवळ महाराजांनी पाळलेला वाघ बसला होता. महाराज शांतपणे विचारत होते की , तुझ्या लाचखोरीची प्रकरणे माझ्या कानावर आली आहेत. हे खरे आहे का ?? अधिकारी बदमाश होता.तो कबुल होईनाच. महाराजांनी मग एक युक्ती केली. बोलता बोलता महाराज आतल्या खोलीत गेले. दिवाणखान्यात उरला तो अधिकारी आणि महाराजांचा पाळलेला वाघ. अधिकारी थोडा घाबरला. थोड्या वेळानं वाघ जरा जास्त गुरगीरुरायला लागला. अधिकाऱ्यांकडे डोळे वटारुन पाहू लागला. अधिकारी जास्तच घाबरला. थोड्या वेळाने वाघ उठून उभा राहिला आणि मग अधिकाऱ्यांचि गाळणच उडली. महाराज , महाराज अशा बोंबा ठोकू लागला. " महाराज , मी भ्रष्टाचार केलाय हो ...या वाघापासून मला वाचवा " अशा आरोळी ठोकू लागला. महाराज सारा प्रकार पाहत होते. अधिकाऱ्यांच्या कबुलीनंतर महाराज बाहेर आले आणि वाघाला माया करून शांत केले.... शाहूराजाने ही जी युक्ती वापरली त्याला आत्यंतिक मानवतावादी म्हणवणारे कदाचित नाक मुरडतील. पण बहुसंख्य जनता शाहूराजाचा मार्ग योग्य असल्याची ग्वाही देतील अशी मला खात्री आहे.*
सध्याच्या लोकशाही राज्यात कदाचित हे मार्ग वापरत नसतील. त्यावर मला काही बोलायचं नाही. पण लाचखोर अधिकारी हे अत्यंत मुर्दाड व मानवतावादविरोधीच मनुष्य असतो हेच खरं. मध्यंतरी एका हिंदी चित्रपटात खूनाचा साक्षीदार असणाऱ्या व आंधळे असल्याचे ढोंग वठवणारे व्यक्तीला त्याचे ढोंगी आंधळेपण बाहेर काढण्यासाठी नायक त्याच्या पायात अस्सल नाग सोडतो. पायाजवळ नाग येताच " आंधळ्याला दृष्टी " येते. खूनाचा उलगडा होतो. हे मार्ग व्यवहार्य आहेत का यावर गोलगप्पा मारणारे मारोत गप्पा. मला मात्र शाहूराजाची युक्ती योग्य वाटली. खटाशी खट , उध्दटाशी,उध्दट हे मानवतवादी पध्दतीने करता येते..हेच शाहूचरित्र शिकवते.
*!! करावा व्यवहार युक्तीने ..अन साधावा कार्यभाग ...प्रामाणिकपणे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
*शाहूचरित्र ...काय शिकवते ??.( भाग १५ )*
राजा..मग तो कुणीही असो , त्याचे राजेपण टिकून असते ते त्याच्या स्वतःच्या पराक्रमबरोबरच त्याच्या राज्यातील कष्टकरी श्रमिकांच्या जोरावर. श्रमिक मग तो साधा कारकुन असो अथवा प्रशासकीय अधिकारी असो...साधा शेतकरी असो वा मंत्रीगण असो . या प्रत्येक कष्टकरी वर्गाच्या श्रमाला जो सन्मान देतो तोच " लोकराजा अथवा रयतेचा राजा " म्हणून गौरविला जातो. कष्टकरी वर्गाचा यथोचीत सन्मान ज्या राज्यात होतो ते राज्य व तो राजा कायमचा स्मृतीत कोरला जातो. शाहूराजा हा असाच थोर राजा..जो आपल्या राज्यातील कष्टकरी वर्गाचा यथोचित सन्मान करत होता. पाहूया ही गोष्ट ...
*शाहूराजा आपल्या खडखड्यातून सोनतळी कँम्पकडे जात होते. सहज लक्ष गेले तर एक वृद्ध स्त्री डोक्यावर शेणी घेऊन विकायला जात होती. भर दुपारची वेळ . तिच्या चेहऱ्यावर असणारे कष्टकरी भाव शाहूराजाने ताडले. खडखडा त्या म्हातारी जवळ नेऊन महाराजांनी दोन रूपये देऊ केले व म्हणाले " दोन रुपये घे आणि डोक्यावरच्या शेणी इथेच टाकून जा " म्हातारीने स्पष्ट नकार दिला. दोन कारणे सांगितली . एक म्हणजे या शेणीची किंमत फक्त बारा आणे होती , दोन रुपये नव्हती. दुसरे असे की , ह्या शेणी रस्त्याकडेला टाकून नुसते पैसे ती घेणार नव्हती. शाहूराजाने " म्हातारीचे मनं " वाचले. तिच्या हातावर बारा आणे ठेवले व सर्व शेणी खडखड्यात ठेवायला बरोबरच्या लोकांना सांगितले. शेणी खडखड्यात बसताच खडखड्यातील लोकांना बसायला गाडीत जागा राहिली नाही. महाराजांनी कसलाही विचार न करता स्वतः पायी चालायला सुरुवात केली. मागोमाग सगळे लोक चालू लागले. नंतर सर्वांनी विनंती करून महाराजांना खडखड्यात बसवले. महाराज जाणाऱ्या त्या म्हातारीकडे एकटक बघत राहिले.....ही गोष्ट काय दर्शविते ?? शाहूराजाचे राज्यातील कष्टकरी वर्ग हा ऐतखाऊ भाड खाणारा नव्हता. आपल्या कष्टाएवढेच पैसे तै घेत होता.आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या कष्टाला प्रमाण मानत होता. म्हातारीने म्हणून तर शेणी रस्त्यावर टाकून जायला नकार दिला. शाहूराजाही किती महान बघा...स्वतःच्या गाडीत त्या कष्टकरी म्हातारीच्या शेणी,भरून स्वतः पायी चालू लागला. ही कृती म्हणजे त्या म्हातारीच्या कष्टाला केलेला सलामच होता. आपल्या जनतेच्या " इमानाला " ओळखणारा असा हा शाहूराजा होता. खडखड्यात पुन्हा बसल्यावर महाराज बरोबरच्या लोकांना स्पष्ट बोलले " एवढं आपल्या मध्ये कुणी इमानी आहे का ? हाताला लागलेले परत करता का कधी ??". शाहूराजा असा जगावेगळा राजा होता.*
अशी कष्टकरी वर्गाची कदर जर आजकालचे राज्यकर्ते करते झाले तर भारत महासत्ता बनायला किती वेळ लागेल हो ? पण हे होणे नाही. कारण ...कारण त्याला काळीज शाहूराजाचे असावे लागते. आपल्या जनतेतील " इमानपणाची खूण " ओळखणारा शाहूराजा म्हणून तर लोकराजा गौरविला गेला. उत्तम राज्यकर्ते व्हायच असेल तर हा गुण असायलाच हवा ...हेच तर शाहूचरित्र शिकवते.
*!! कष्टकरी वर्गाचे ओळखावे इमान...तरच राज्यकर्ते म्हणून व्हाल महान !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १६ )*
राज्यकर्ते वर्गाबद्दल आदरभाव बाळगून वर्तन करावे असा संकेत असला तरीही तसा राज्यकर्तेही असावे लागतात. शिवाजी महाराजांकरता प्रसंगी प्राण देणारे मावळे होते म्हणून तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. महात्मा गांधीच्या अंगावर पडणारी प्रत्येक लाठी आपल्या खांद्यावर झेलणारे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते म्हणून तर देश स्वातंत्र्य होऊ शकला. अगदी तसेच शाहूराजालाही अनेक माणसे जिवाभावाची भेटलीत म्हणून तर " पिलर आँफ सोशल डेमाँक्राँसी " असे सार्थ वर्णन शाहूराजाचे झाले. पण लोकहो , हा व्यवहार काही एकतर्फी नसतो. स्वतः शिवराय आपल्या मावळ्याकरता रणांगणावर शत्रू समोर उभे ठाकत होते ...गांधी स्वतः सर्वात पुढे सत्याग्रहात चालत होते..तसाच शाहूराजा आयुष्यभर आपल्या दिनदलीत रयतेच्या काळजीने जगत राहिला. हे " देणे - घेणे " असे दुतर्फा असते.
*किशाबापू खतकर..हा नोकर शाहूराजावर जिवापाड प्रेम करायचा. अशिक्षित असल्याने डोक्यात देव - भूत पिशाच्च ह्या कल्पना ठासून भरलेल्या होत्या. महाराज जरा चिंतेत दिसले की देवाची आळवणी करून इडा पीडा टळो अशी प्रार्थना करायचा. महाराज जरा कमी जेवले की महाराजांच्या नकळत लांबूनच त्यांच्या शरीरावरुन मिरच्या उतरुन दृष्ट काढायचा. डोळ्यांत पाणी भरले काळजीने तर महाराजांनी ध्यानात येऊ नये म्हणून डाव्या हाताच्या बाहीने डोळे पुसायचा. एकदा महाराज शिकारीकरता शेडबाळले गेले. रस्त्यावर मुस्लिम समाजाची माणसे भेटली व महाराजांना म्हणली हुजुर , काळवीटानी धुडगूस घातला आहे. बंदोबस्त करावा. महाराज शिकारीला बाहेर पडले. किशाबापूला लोकांच्या कडून कळले की त्या भागातील एक पट्टाच्या पट्टा दलदलीचा असून तो वरुन जमिनीसारखा भासतो , परंतु त्यावर पाऊल टाकताच माणूस खैल रुतला जाऊन जमिनीत गडप होतो. हे ऐकून किशाबापू घाबरला. महाराजांच्या विषयी काळजी वाटायला लागली. संध्याकाळ झाली तरी महाराजाचा पत्ता नाही हे बघून महाराजांना शोधायला बाहेर पडला. मोटारीच्या कार्बाईटचा दिवा घेऊन शोधाशोध सुरू झाली. थकून भागून परतणारे महाराज त्याला दिसले. तेव्हा किशाबापूला राग आवरला नाही. तो सरळ महाराजांना म्हणाला " कुठल्यातरी आंग्या - सांग्याने सांगताच विश्वास ठेवून शिकारीला जायचृ का ? त्या दलदलीत अडकला असतात तर ? " प्रत्यक्ष महाराजांना किशा बोलतोय हे बघून भोवतीची माणसे घाबरली. परंतु महाराजांनी आपल्या या अशिक्षित पण मायाळू , प्रेमळ नोकराची माया जाणली. ते फक्त हसले. किशाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणले " चल बाबा , चुकलं माझं ".....ही गोष्ट किशाबापू सारख्या सामान्य नोकराचे आपल्या राजावरील प्रेम दर्शवितेच पण त्याबरोबरच शाहूराजाचे " साधं मनं " दर्शवते. एका सामान्य नोकराला अवतीभोवतीचे लोकांसमोर " माझं चुकलं " अस एक छत्रपती म्हणतो हा त्या छत्रपतीच्या मनाचा मोठेपणा आहे. तो नीट समजून घ्यायला हवा.*
असेच एकदा ...साठमारीच्या खेळावेळी एका हत्तीचा दात धडका देताना मोडल्याने हत्ती उन्मत्त झाला. हत्तीचा माहूत अंबादास हा हत्तीला सावरण्याकरता साठमारीचे मैदानात उडी मारून उतरला. हत्ती उन्मत्त आहे तो अंबादासला मारणार हे ध्यानात येताच शाहूराजाने स्वतः त्या माहूताछि जीव वाचवण्यासाठी साठमारी मैदानात उडि घेतली. आपल्या सामान्य नोकरासाठी जो स्वतः मरायला तयार होतो त्या शाहूराजाला जिवाभावाचि लोक मिळणरच. आपल्या नोकरांप्रतीही माणुसकी भावना ठेवून त्यांना माणूस म्हणून वागवा..हेच तर शाहूचरित्र संदेश आहे.
*!! व्यक्ती म्हणून सन्मान करावा...जीव लावावा...तरच " जीव " देणारे भेटतात !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
*शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १७ )*
सण - उत्सव यांचे महत्त्व मानवी जीवनात असाधारण आहे. धकाधकीच्या जीवनातील स्पर्धेत सण उत्सव माध्यमातून सामान्य माणसापासून गर्भश्रीमंत माणसापर्यत सर्वजण आनंदनिधान पावत असतात. महत्त्वाचा फरक इतकाच की श्रीमंत वर्ग ऋण न काढता सण करतो आणि गरीबाला ऋणाशिवाय उत्सव करता येत नाही. हे वास्तव पचवूनही सण उत्सवाचे महत्त्व नाकारता येत नाही . सण साजरा करण्याची प्रत्येक वर्गाची एक वेगळी पध्दती असते. विषय शाहूराजाचच चालूय तर महाराजाची एक दिवाळी नजरेखालून घालूया...
*दिवाळी ...सणाचा आनंद काही औरच असतो.पणती व आकाशकंदीला व्दारे प्रकाशाने आकाश उजळून निघते. लाडू चिवडा करंजी अशा तिखटगोड पदार्थाची रेलचेल असते. शाहूराजाही दिवाळी दिवशी राजवाड्यावरील सर्व विधी आटोपून गावात फेरफटका मारायला बाहेर पडले. रथातून खाली उतरणार इतक्यात झाडांच्या मागे लपलेल्या लहान मुलावर नजर पडली. महाराजांनी जवळ बोलवताच तो लहानगा रडू लागला. त्याच्या हातात एक डबा होता. महाराजांनी विचारताच माझ्या बाबाचे जेवण आहे अस तो बोलला. बाबा कुठं आहेत अस विचारताच मुलाने बोट करून पाठिमागील फुटबोर्डावर उभ्या असलेल्या गृहस्थाकडे दखवले. महाराजांनी डबा उघडला तर त्यात दोन भाकरी व जरासा झुणका दिसला. अख्खे शहर गोड पदार्थ खात असताना माझ्या नोकराच्या घरात हे दारिद्रय ? महाराज गलबलले. महाराज सावरले.जासूदाला बोलवून " या पोराला घेऊन जा , आंघोळ घाल " असे फर्मावत उटणे व अत्तर दिले. आंघोळ करून पोरं परतले. महाराजांनी त्या पोराला जवळ घेऊन नवीन कपडे आणले. स्वतःच्या हाताने त्याला चढवू लागले. दूरवरुन त्या पोराचा बाप डोळ्यांत आनंदाश्रु आणून सर्व पाहत होता. नंतर महाराजांनी त्या पोराबरोबर जेवण घेतले आणि सर्व घराला पुरेल इतका फराळ बांधून त्या पोराला आपल्या गाडीतून घरी सोडायला लावले.....ही गोष्ट काय सांगते ?? महाराज नुसते राज्यकर्ते नव्हते तर सच्चा माणुसकीचा पाझर होते. आपल्या रयतेच्या वाट्यालाही आनंदाचे दोन क्षण यावेत अशी त्यांच्या मनाची आस होती . सण प्रत्येकाला असतो पण जे लोक ते साजरा करण्याची " ऐट " करु शकत नाहीत त्यांना आपल्या वाट्याचे दोन घास द्यावेत हीच तर माणुसकी..हीच बंधूता.*
जो राज्यकर्ता आपल्या रयतेप्रती इतका जिव्हाळा हृदयात जपतो त्याला नेमके काय म्हणावे बरं ?? प्रश्न आहे. सामान्य रयत त्यालाच " देव " संबोधिते. बुध्दिजिवी वर्ग त्याला " राजातील माणूस आणि माणसातील राजा " असे विशेषण लावते. शेवटी काय हो...दुसऱ्याचे सुख व दुःख जो आपले मानतो तोच " खरा माणूस " असतो हेच शाहूचरित्र सांगते.
*!! द्यावा गरीबाला एक घास....तिथेच असेल माणुसकीचा वास !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
*शाहूचरित्र ....काय दर्शवते??( भाग १८ )*
राजा म्हटल की , त्याला व्यसन हे चिकटलेलेच असते. सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक सर्व राजेशाहीचे यवच्छेदक लक्षण आहे. आमचे बहुतेक सारे राजे दारुच्या व्यसनात आकंठ बुडालेले आपण पाहिलेत. दारुची नशा ..त्यांना जनतेच्या कल्याणाची बातच करु देत नव्हती. पिढ्यानपिढ्या राजा नंतर युवराज अशा क्रमाने दारुने राजेशाहीला विळखा घातलेला होता. शाहूराजा संबंधित ही गोष्ट मला लैलै आवडलीय...पाहूया
*एक दिवस शाहूराजा कसबा बावडा येथील आपल्या वडिलांच्या निवासस्थानी सिस्टर्स पँलेस येथे गेले. आबासाहेबांचा मृत्यू दारुच्या व्यसनाने झाला होता. या कारणाने शाहूराजाला दारुचा अत्यंत तिटकारा होता. दिवाणखान्यातील आबासाहेबांची तसबीर पाहून महाराज क्षणभर थबकले. आणि तसेच आबासाहेबांच्या आधुनिक अशा मद्यपानगृहात शिरले. आत जातात न् जातात तोच " फाड फाड " असा जोरदार आवाज येऊ लागला. काय चालले आहे हे बघण्यासाठी सारे आत शिरले तर मद्यपानगृहातील सर्व दारुच्या बाटल्याआचा चक्काचुर झाला होता. महाराज स्पष्ट बोलले " आमच्या आबासाहेबांच्या पोलादी शरीराची राखरांगोळी करणारी , आम्हाला व आमच्या बापूसाहेबांना पोरके करणारी ही दारु आमच्या आबासाहेबाच्या निवासस्थानी हवीच कशाला ??.....ही गोष्ट काय सांगते ?...पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी ही महाराजांची कृती आहे. आबासाहेबाचे पोलादी शरीर दारुने नासवले ह्या रागाला अत्यंत विधायक वळण सर्व दारुच्या बाटल्या फोडून महाराजांनी दिले असे मला वाटते. जे आपल्याला नासवते त्याला घरात ठेवायचेच कशाला ? हा यथार्थ विचार यामागे होता. शाहूराजा आयुष्यभर दारुपासून दूर राहिला. अगदी डाँक्टरनी दिलेली औषधातून दारुही ( ब्रँन्डी ) महाराजांनी घ्यायला नकार दिला अशी गोष्ट आहे.एकदा हा प्याला तोंडाला लागला की तो खाली ठेवता येत नाही ..म्हणून तो तोंडाला लावूच नये अशी ही प्रतिबंधक योजना आहे.*
आजकालचे राज्यकर्ते धान्यापासून दारु बनवण्याची योजना आखतात..महसूल मिळावा म्हणून विक्रीसाठी मंजूर करतात. परवाने देऊन भावी पिढी नासवतात. शाहूराजा व आजकालचे राज्यकर्ते यांच्यात हा फरक आहेच आहे. व्यसनापासून दूर राहिले तरच जनतेच्या हिताचा व्यवहार करता येतो..हेच शाहूचरित्र सांगते.
*!! व्यसनाला द्या नकार...जनहिताला द्या कृतीशील आकार !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५